शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

शाळा-महाविद्यालयात गाजणार का तंटामुक्त मोहीम?

By admin | Updated: June 25, 2014 23:52 IST

महाराष्ट्र शासनाने ३० नोव्हेंबर २०१० रोजी एक शासन निर्णय काढून शाळा महाविद्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेवर आधारित वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते.

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने ३० नोव्हेंबर २०१० रोजी एक शासन निर्णय काढून शाळा महाविद्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेवर आधारित वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते. या निर्णयाला चार वर्षाचा कालावधी लोटत असतानाही जिल्ह्यात एकाही महाविद्यालयात किंवा शाळेत तंटामुक्त वक्तृत्व स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही. तंटामुक्त मोहिमेची प्रखरपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने शाळा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करावे, असे शासनाने नमूद केले होते. या मोहिमेत व्यापक लोक सहभाग नोंदविण्यासाठी अभिनव संकल्पना निर्माण करून ही मोहीम लोक चळवळ होण्यासाठी जिल्हास्तरावर नेतृत्व प्रदान करायचे होते. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महविद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विकासात्मक प्रशासनाच्या माध्यमातून राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे आकलन वाढविणे हा उद्देश शासनाचा होता. विद्यार्थ्याना समकालीन समस्याचे यथार्थ ज्ञान व्हावे, ज्ञानाच्या कक्षा रुंदावून आणि सामाजिक अधिक प्रगल्भ व्हाव्यात आणि त्यांचे क्षितीज विस्तारावे यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यातआले होते. मोहिमेत तरूणाचा सहभाग वाढावा, भविष्यात सामाजिक राजकीय क्षेत्रात निर्माण होणारे नेतृत्व सजग व क्रियाशील व्हावे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापुरत्या मर्यादित शिक्षणात गुंतवून न ठेवता त्यांच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे विद्यार्थ्याना साक्षेपी आकलन व्हावे, या उद्देशातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेबाबत प्रत्येक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात वादविवाद, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले होते. परंतु जिल्ह्यातील एकही शाळेत तंटामुक्त मोहिमेवर आधारित निबंध, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही. तरूणांचा मोहिमेत सहभाग वाढावा याबाबीला जिल्ह्यात तिलांजली देण्यात आली. महाराष्ट्र शासनाने शांततेतून समृध्दीकडे जाण्यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू केली. या मोहीमेचा मर्म विद्यार्थ्याना माहित व्हावा यासाठी शासनाने ही मोहीम विविध स्पर्धेच्या माध्यामातून शाळा महाविद्यालयात रूजविण्यास सांगितले. (तालुका प्रतिनिधी)