शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वन्यप्राण्यांची मानववस्तीकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

सडक-अर्जुनी : यावर्षी तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर होत आहे. नदी-नाले, तलाव व लहान बोड्या कोरड्या ...

सडक-अर्जुनी : यावर्षी तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर होत आहे. नदी-नाले, तलाव व लहान बोड्या कोरड्या पडल्याने मानवासह वन्यप्राण्यांचीसुद्धा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. जंगलातील पाणवठेसुद्धा कोरडे पडले असून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वाढते तापमान व पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यूसुद्धा होत आहे. तालुक्यात शशीकरण पहाडी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे.

गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यावर्षी एप्रिल महिन्यात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी उन्हाळा चांगलाच पडल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत आहे. पाण्याअभावी व उष्णतेच्या दाहकतेमुळे रानगवासारख्या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वन आणि वन्यजीव विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

.......

२० वर्षांपासून तलावातील गाळाचा उपसा नाही

नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील थाडेझरी गावाजवळील तलाव पूर्णतः कोरडा पडला आहे. सन १९९८ पासून थाडेझरी येथील तलावाचे वन्यजीव विभागाने खोलीकरण केले नाही. थाडेझरीपासून नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प ७ किमी. अंतरावर आहे. थाडेझरी हे गाव पुनर्वसित गाव आहे. तलाव पूर्णतः कोरडा पडला पडल्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यामुळे वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टँकर लावून पाणवठ्यात पाण्याची सोय

नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात २५६ पाणवठे असून त्यापैकी ७८ नैसर्गिक स्त्रोतांचे तर १५४ कृत्रिम पाणवठे असून २४ तलावही या क्षेत्रात आहेत. १५४ कृत्रिम पाणवठ्यात पाणीपुरवठा व्हावा यासाठी १४९ हातपंप तयार केले आहेत. त्यापैकी ११० हातपंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत. १३ पाणवठ्यात ३ टँकरव्दारे पाण्याची सोय केली जात आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर वन्यप्रेमींनी जंगलातील कुठल्याच पाणवठ्यात पाण्याची सोय करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. काही निसर्गप्रेमी संस्थांनी आवाज उठविल्यानंतर वन्यजीव विभागाने टँकर लावून पाण्याची सोय केल्याची माहिती दिली.