शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

=पाणी न मिळाल्याने वन्यप्राण्यांच्या जीवास धोका

By admin | Updated: May 19, 2014 23:40 IST

वाढत्या तापमानाने जमिनीतील पाण्याचे स्रोत आटल्याने माणसासोबतच वन्यप्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. जंगलातील पाणवठ्यांचे पाणी संपल्याने विविध प्राणी

गोंदिया : वाढत्या तापमानाने जमिनीतील पाण्याचे स्रोत आटल्याने माणसासोबतच वन्यप्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. जंगलातील पाणवठ्यांचे पाणी संपल्याने विविध प्राणी गावालगत व वाहतुकीच्या रस्त्यावर आढळून येत आहेत. या प्राण्यांचा पाण्याअभावी मृत्यू होऊ शकतो. त्यातच शिकार्‍यांना शिकारीची संधी नाकारता येत नाही. त्यामुळे या काळात वन्यजीव संरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अनेक जंगले आहेत. त्यात अनेक वन्यप्राण्यांचे स्थान आहे. प्रामुख्याने नागझिरा, नवेगावबांध, उमरझरी व मुरदोली जंगल परिसर भागात याचे प्रमाण जास्त आढळते. त्यात हिंस्त्र प्राणीही आहेत. जंगल भागातील नैसर्गिक पाण्याचे साठे आटल्याने व पाणवठे कोरडे राहात असल्याने वन्यप्राणी गावालगत पाण्याच्या शोधात येत आहेत. सायंकाळच्या सुमारास प्राणी थंड ठिकाणी व रस्त्यावर येत असल्याने त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडत आहे. जंगलात पाणी मिळत नसल्याने तहानेने व्याकूळ प्राण्यांचे कडप दिवसाढवळ्या गावालगतच्या तळ्यांवर व नहरावर तहान भागविण्यासाठी येत असतात. त्यातच जंगलातील रहदारी असलेल्या ठिकाणीही हे प्राणी येत आहेत. तहानेने व्याकूळ झालेल्या या प्राण्यांना पाणी मिळत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या निराधार प्राण्यांची शिकारसुद्धा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या काळात वन्यजीवांना धोका संभवतो. हरिण, सांबर, चितळ, बारासिंगे, रानगवे, नीलघोडे व अन्य वन्यप्राण्यांचा यात समावेश असल्याचे आढळते. त्यामुळे शिकार करणार्‍यांना चांगली संधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाघ, अस्वल यासारखे हिंस्त्र प्राणी पाण्यालगतच्या परिसरात दबा धरून राहतात. त्यामुळे तहानेने व भुकेने व्याकूळ प्राणी प्राणघातक हल्ला चढविण्यासही मागे-पुढे पाहत नाही.जंगलातील पाणवठ्यामध्ये उन्हाळ्यात पाणी भरण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.