शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

=पाणी न मिळाल्याने वन्यप्राण्यांच्या जीवास धोका

By admin | Updated: May 19, 2014 23:40 IST

वाढत्या तापमानाने जमिनीतील पाण्याचे स्रोत आटल्याने माणसासोबतच वन्यप्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. जंगलातील पाणवठ्यांचे पाणी संपल्याने विविध प्राणी

गोंदिया : वाढत्या तापमानाने जमिनीतील पाण्याचे स्रोत आटल्याने माणसासोबतच वन्यप्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. जंगलातील पाणवठ्यांचे पाणी संपल्याने विविध प्राणी गावालगत व वाहतुकीच्या रस्त्यावर आढळून येत आहेत. या प्राण्यांचा पाण्याअभावी मृत्यू होऊ शकतो. त्यातच शिकार्‍यांना शिकारीची संधी नाकारता येत नाही. त्यामुळे या काळात वन्यजीव संरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अनेक जंगले आहेत. त्यात अनेक वन्यप्राण्यांचे स्थान आहे. प्रामुख्याने नागझिरा, नवेगावबांध, उमरझरी व मुरदोली जंगल परिसर भागात याचे प्रमाण जास्त आढळते. त्यात हिंस्त्र प्राणीही आहेत. जंगल भागातील नैसर्गिक पाण्याचे साठे आटल्याने व पाणवठे कोरडे राहात असल्याने वन्यप्राणी गावालगत पाण्याच्या शोधात येत आहेत. सायंकाळच्या सुमारास प्राणी थंड ठिकाणी व रस्त्यावर येत असल्याने त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडत आहे. जंगलात पाणी मिळत नसल्याने तहानेने व्याकूळ प्राण्यांचे कडप दिवसाढवळ्या गावालगतच्या तळ्यांवर व नहरावर तहान भागविण्यासाठी येत असतात. त्यातच जंगलातील रहदारी असलेल्या ठिकाणीही हे प्राणी येत आहेत. तहानेने व्याकूळ झालेल्या या प्राण्यांना पाणी मिळत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या निराधार प्राण्यांची शिकारसुद्धा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या काळात वन्यजीवांना धोका संभवतो. हरिण, सांबर, चितळ, बारासिंगे, रानगवे, नीलघोडे व अन्य वन्यप्राण्यांचा यात समावेश असल्याचे आढळते. त्यामुळे शिकार करणार्‍यांना चांगली संधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाघ, अस्वल यासारखे हिंस्त्र प्राणी पाण्यालगतच्या परिसरात दबा धरून राहतात. त्यामुळे तहानेने व भुकेने व्याकूळ प्राणी प्राणघातक हल्ला चढविण्यासही मागे-पुढे पाहत नाही.जंगलातील पाणवठ्यामध्ये उन्हाळ्यात पाणी भरण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.