शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

गॅस पाइपलाइनसाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:34 IST

पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर : पीक घेता येणार नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : गोंदिया जिल्ह्यातून गेल इंडिया लिमिटेड कंपनीची गॅस पाइपलाइन जात आहे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाइपलाइन जात आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यात आला असला तरी ज्या ठिकाणाहून पाइपलाइन गेली आहे त्या ठिकाणी शेती व्यतिरिक्त इतर कोणतेही बांधकाम करता येऊ शकत नाही. परिणामी याला आता विरोध सुरू झाला असून या पाइपलाइनला कवलेवाडा येथील शेतकऱ्यांनी विरोध केला असून पाइपलाइनच्या कामासाठी जमीन देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील शेतकऱ्यांच्या शेतातून गेल इंडिया कंपनीच्या मुंबई-नागपूर ते झारसुकडा गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. याकरिता अधिग्रहित करण्यात येत असलेल्या जमिनीचा मोबदला तज्ज्ञांकडून जमिनीच्या बाजारभावाच्या किमतीच्या फक्त १० टक्के रक्कम दिली जाणार आहे. जी बाधित क्षेत्राच्या तुलनेत खूप कमी आहे. गेल कंपनी वीस मीटर रुंद पट्टीची जमीन बाधित क्षेत्र म्हणून वापर करण्याचा हक्क बळजबरीने संपादित करणार आहे. २० मीटर रुंदीच्या पट्टीत शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. गुरांचा गोठा, तळे, विहिरी, पाण्याचा साठा किंवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. आपल्याच शेतात कोणत्याही प्रकारचे झाड लावता येणार नाही. गेलच्या कामाला घेऊन परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणूनच कवलेवाडा येथील शेतकरी आपली शेती गेल कंपनीला द्यायला तयार नाहीत. याविषयी शेतकऱ्यांशी तडजोड करायला उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (म. राज्य), गेल इंडिया व त्यांची संपूर्ण टीम गावात आली होती. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भविष्यात करणार असलेल्या योजना सांगितल्या व होणाऱ्या नुकसानीची योग्य ती भरपाई देण्याची व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळवून देण्याची मागणी केली. पण तुमच्या मागण्या जरी रास्त असल्या तरी आम्ही पूर्ण करू शकणार नाही असे सांगितले. यावर शेतकऱ्यांनी गॅस पाइपलाइनसाठी एकमताने विरोध केला. आमच्या परवानगीशिवाय शेतात कोणत्याही प्रकारचे काम करू नये, असे सांगितले. यामुळे गॅस पाइनलाइन काम बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व शेकडो शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढगेल इंडिया कंपनीच्यावतीने सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. कंपनीच्या जाचक अटी शेतकऱ्यांना मारक ठरत आहेत. परिणामी गावागावात या पाइपलाइनला विरोध दर्शविण्यात येत आहे. आपल्याच शेतीत शेतकऱ्यांना आखलेल्या योजना व इतर उद्योग व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

टॅग्स :farmingशेतीgondiya-acगोंदिया