शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पांगोलीच्या संवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

गोरेगाव तालुक्यातील तेढा तलावातून या नदीचा उगम झाला आहे. गोंदिया तालुक्यातील कामठा नजिक छिपीया या गावाजवळ देवरी- आमगाव तालुक्याकडून येणारी वाघ नदी व पांगोली नदीचा पवित्र संगम होतो. पुढे जाऊन ही नदी मध्यप्रदेश सीमा क्षेत्रात वाहते. गोरेगाव तालुक्यात २५ कि.मी.,गोंदिया तालुक्यात ३० कि. मी. व आमगाव तालुक्यात १५ कि. मी. असा जवळपास एकूण ७० कि. मी. या नदीचे प्रवाह क्षेत्र आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कित्येक वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली पांगोली नदी सद्या परिस्थीतीत शेवटच्या घटका मोजत आहे. तिचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाण्याअभावी शेतकरी,नागरिक,पशु-पक्षींचे हाल होत आहेत. जीवनदायीनी पांगोली नदीच्या संरक्षण व संवर्धनासाठी अनेकदा निवेदन दिले. पण याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. भविष्यात उद्भवणाऱ्या जलसंकटाची चाहुल लागली नाही,ही मोठी शोकांतिका आहे. मात्र या नदीचे सरंक्षण,संवर्धन व विकास व्हावा, यासाठी जिल्ह्यात हळूहळू जनजागृती होऊन जनमत तयार होत आहे,ही आनंदाची बाब आहे.         गोरेगाव तालुक्यातील तेढा तलावातून या नदीचा उगम झाला आहे. गोंदिया तालुक्यातील कामठा नजिक छिपीया या गावाजवळ देवरी- आमगाव तालुक्याकडून येणारी वाघ नदी व पांगोली नदीचा पवित्र संगम होतो. पुढे जाऊन ही नदी मध्यप्रदेश सीमा क्षेत्रात वाहते. गोरेगाव तालुक्यात २५ कि.मी.,गोंदिया तालुक्यात ३० कि. मी. व आमगाव तालुक्यात १५ कि. मी. असा जवळपास एकूण ७० कि. मी. या नदीचे प्रवाह क्षेत्र आहे. एकेकाळी   नदीच्या पाण्यावर नदी क्षेत्रातील शेतकरी शेती पिकवायचे नदीच्या पाण्यावर दुबार पीक घेऊन प्रसंगी  बागायती शेती करायचे. नदीच्या पाण्यात नदीकाठी असलेल्या राईस मिल, लाख कारखाने, औद्योगिक उपक्रमांमधून सोडले जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे प्रदूषण वाढले आहे.

नदीची सिंचन क्षमता संपुष्टात nमानवी हस्तक्षेपांमुळे नदीत पसरत असलेल्या प्रदूषणामुळे,नदी काठची झाडे-झुडपांची नागरिकांनी अवैधपणे केलेल्या कटाईमुळे जलप्रदूषणासह,नदीच्या पाण्यावर  अवलंबून असलेल्या शेतजमिनीच्या मातीचे ही प्रदूषण झाले. नदी परिसरातील पाण्याची पातळी ही खोलवर गेली आहे.  मार्च-एप्रिल महिन्यातच विहिरी कोरड्या पडू लागल्यात. बोअरवेल खोदल्यावरही पाणी २५० फुटावरच लागते. नदीची सिंचन क्षमता संपुष्टात आल्यामुळे शेती व शेतकरी ही संकटात सापडला आहे.     पांगोली नदीवर बंधारे बांधाnउन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नदीपात्रातून गाळ उपसा करून नदीचे खोलीकरण करणे,नदी प्रवाह क्षेत्रात जागोजागी ३ ते ५ कि. मी. अंतरावर कोल्हापुरी धर्तीचे बंधारे बांधणे,नदीच्या दोन्ही बाजूच्या काठांची दुरुस्ती करणे, नदीच्या दोन्ही काठांवर पर्यावरणास पोषक झाडे लावणे,नदीकाठावरील राईस मिल्स, लाख कारखाने आदी औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी नदी पात्रात येण्यापासून मज्जाव करणे गरजेचे असल्याचे समाजोन्नती बहु. ग्रामीण व शहरी विकास संस्था, गोंदिया सचिव तिर्थराज उके यांनी सांगितले.

 

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीकपात