शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

कॉन्व्हेंटच्या पिकाला लगाम कोण घालणार?

By admin | Updated: June 15, 2014 23:38 IST

सध्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये मुले घालायची फॅशन जोमात सुरू आहे. पालकांच्या दृष्टीने ते एक सामाजिक प्रतिष्ठेचं (?) देखील लक्षण आहे. याचाच फायदा घेवून काही संस्थांनी आवश्यकता नसेल तेथे देखील

नवेगावबांध : सध्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये मुले घालायची फॅशन जोमात सुरू आहे. पालकांच्या दृष्टीने ते एक सामाजिक प्रतिष्ठेचं (?) देखील लक्षण आहे. याचाच फायदा घेवून काही संस्थांनी आवश्यकता नसेल तेथे देखील कॉन्व्हेंट नावाचा पसारा सुरू केला. सध्या हे कॉन्व्हेंटचे पीक इतक्या जोमात वाढत आहे की यावर लगाम कोण घालणार याचाच प्रश्न सध्या सामान्य जनांना भेडसावत आहे.सुमारे अडीच ते पाच वर्षे वयादरम्यान असलेली बालके कॉन्व्हेंटमध्ये घातली जातात. निटनेटका ड्रेस, टाय, बेल्ट, आयकार्ड, पाठीवर दप्तर, टिफीन, वाटरबॅग आदी आयुधांनी सजलेला आपला बालक बघायला पालकांनादेखील वन्यता वाटते. बालक कॉन्व्हेंटमध्ये जातो. चांगल्या गोष्टी शिकतो, चांगल्ळा सवई लागतात, कविता म्हणून दाखवितो ही बाब जरी सत्य असली तरी बालकांच्या मानसिकतेनुसार अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो काय याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.वास्तविकपणे या वयातील बालकांच्या मानकशास्त्रानुसार त्यांच्यासाठी अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब करायला हवा. आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून हे करतेदेखील शक्य आहे. परंतु गुणात्मक प्रगतीवर संख्यात्मक प्रगती वरचढ झाल्यामुळे शिक्षण पद्धतीतील आनंद पार विरुन गेला आणि त्याची जागा धोकपट्टीने घेतली. बरे अनेक पालकाननी देखील या धोकपट्टीवर विश्वास ठेवला. कॉन्व्हेंटमध्ये अध्यापन करणारे किती जण प्रशिक्षित आहेत. त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती कोणत्या हे कळायला मात्र मार्ग नाही. ज्या कोवळ्या वयात बालकांच्या मनाला वळण द्यायचे असते ते काम कुशल कारागिराकडून होने अपेक्षित असते. परंतु बऱ्याच ठिकाणी मात्र तसे होताना दिसत नाही. बरे शिक्षकांची पालकांकडे व पालकांची शिक्षकांकडे बालकाला तक्रार करण्याची समज नसते. आपली कोवळी फुले कोमेजून तर जाणार नाही ना याचा विचार प्रशासनापेक्षा पालकांनी अधिक करणे गरजेचे आहे. शहरापासून तर गावखेड्यापर्यंत रस्त्याच्या आजूबाजूला अनेक कॉन्व्हेंटचे बोर्ड लागलेले दिसतात. पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधांचे त्यामध्ये प्रदर्शनदेखील केलेले असते. पण प्रत्यक्षात किती कॉन्व्हेंटमध्ये तशा सुविधा उपलब्ध असतात हे सांगणे मात्र सध्या तरी कठिण आहे. वर्गखोली, विजेची सोय, बसण्याची सोय, विद्यार्थी संख्येनुसार खेळणी, मैदान, मुतारी, संडास, पंखा, लाईट, पिण्याचे शुद्ध पाणी, प्रशिक्षित अध्यापक आदी मूलभूत सोई प्रत्येक कॉन्व्हेंटमध्ये असणे आवश्यक आहे. परंतु या सोई मात्र अनेक कॉन्व्हेंटमध्ये सध्या तरी उपलब्ध नाहीत. या कोवळ्या कळ्यांना फुलवायचे काम कॉन्व्हेंटच्या माध्यमातून व्हायला हवे. यासाठी बालकांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक क्षमतांचा विचार करुन त्यांना आवडेल त्या पद्धतीने अध्यापनाचे कार्य होणे अपेक्षित आहे. बरे यासाठी पालक पैसेदेखील मोजतात. परंतु वर्षाच्या शेवटी बालकाचे मूल्यमापन मात्र गुणपत्रिकांच्याच आधारे होत असते हे वास्तव्य आहे. बरे कॉन्व्हेंटच्या तपासणीवर देखील प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिले नाही. काही कॉन्व्हेंटमध्ये निकषांची पूर्तता होते ही अभिनंदनीय बाब असली तरी बरेच ठिकाणी मात्र निकषांची ऐसीतैशी केली जाते. पाठ्यपुस्तके, युनिफॉर्म, लेखन साहित्य, दप्तर, अ‍ॅडमिशन, यासाठी पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो. परंतु या बदल्यात या फुलांना फुलवत ठेवण्याचे काम होते किंवा नाही याचा विचार व उपाययोजना सर्वच स्तरावरुन होणे अपेक्षित आहे. अन्यथा ही फुले करपल्याशिवाय राहणार नाहीत हे वास्तव्य आहे. (प्रतिनिधी)