शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

जि.प.तील युती तोडण्याचा निर्णय घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

एकूण ५३ सदस्यीय जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १७ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघेही एकत्र येऊन जि.प.मध्ये सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र केवळ स्थानिक पातळीवरील राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी साडेचार वर्षांपूर्वी भाजपशी अभद्र युती करुन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग अवलंबिला.

ठळक मुद्देसहा महिन्यांसाठी होणार का सत्तापालट? राजकीय घडामोडींचा आगामी निवडणुकांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रातील सत्ताकारणात झालेल्या उलटफेरीचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. गुरूवारी (दि.२८) नव्या सरकारचा शपथ विधी होणार आहे. या सर्व घडामोंडीचा परिणाम गोंदिया जि.प.तील भाजप आणि काँग्रेस यांच्या अभद्र युतीवर होणार काय,ही अभद्र युती तोडण्याचा निर्णय नेमका घेणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.एकूण ५३ सदस्यीय जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १७ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघेही एकत्र येऊन जि.प.मध्ये सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र केवळ स्थानिक पातळीवरील राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी साडेचार वर्षांपूर्वी भाजपशी अभद्र युती करुन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग अवलंबिला. त्यामुळे सर्वाधिक जागा निवडून येऊन सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले. यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन निवडणुका लढविल्या.तर भाजपने सुध्दा काँग्रेस हा आमचा समविचारी पक्ष होऊच शकत नाही असे सांगितले होते. तर काँग्रेसच्या नेत्यांनी सुध्दा हाच सूर आवळला होता. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी जि.प.तील अभद्र युती तोडू असे सांगितले होते.मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतरही यावर कुठलाच निर्णय झाला नाही. त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाला सुध्दा नवीन कलाटणी मिळाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तीन्ही पक्ष एकत्र आले आहे.तर हाच फार्म्युला गोंदिया जि.प.तील अभद्र युतीसंदर्भात लागू करणार का? असा सवाल जिल्हावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.सहा महिन्यांसाठी काडीमोड घ्यायचा का?गोंदिया जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ जुलै २०२० मध्ये पूर्ण होत आहे.त्यामुळे त्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणे अपेक्षीत आहे. निवडणुकीसाठी सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने केवळ सहा महिन्यांसाठी अभद्र युती तोडायची का असा सुध्दा मतप्रवाह या दोन्ही पक्षात असल्याची माहिती आहे.जिल्हा काँग्रेसमध्ये आता चलती कुणाची?माजी आ.गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण हे त्यांच्याच अवतीभवती केंद्रीत होते. जिल्ह्यात काँग्रेस पक्षात त्यांचा शब्द अंतीम मानला जात होता. मात्र त्यांनी पक्षांतर केले असल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये नेमकी चलती कुणाची प्रश्न उपस्थित केला जात आहे.काँग्रेसचा गटनेता बदलणारजिल्हा काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत जि.प.तील भाजपसोबत असलेली अभद्र युती तोडण्यासंदर्भात निर्णय झाला. जि.प.चे नवीन गटनेते म्हणून पी.जी.कटरे यांची निवड करण्यात आली असून या संबंधीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.जिल्हाधिकाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जि.प.तील अभद्र युती संपुष्टात येणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अमर वºहाडे यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद