शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

नगरपंचायतची विकासकामे रुळावर कधी येणार? समस्यांमुळे नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:01 IST

Gondia : तब्बल तीन वर्षांनंतर मिळाले मुख्याधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : मागील दोन ल दोन वर्षांपासून ना पदाधिकारी ना मुख्याधिकारी, अशी अवस्था असलेली येथील नगरपंचायत नेहमी विविध समस्यांसाठी चर्चेत राहिली आहे. नियमित मुख्याधिकारी नसल्याने येथे विकासकामांवर सतत फटका बसत आहे. आता तब्बल तीन वर्षांनंतर मुख्याधिकारी लाभले असून, ते नियमित राहील का आणि विकासकामे होतील का, असा प्रश्न शहरवासी करीत आहेत.

सालेकसा नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर अनेक वर्षे नगरपंचायतवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतर मुख्याधिकारी म्हणून आशिष चौहान दोन वर्षे राहिले. फक्त एकदा निवडणुकीतून कारभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना इतरांशी समन्वय साधून ठेवण्यात अपयश आले होते. पक्ष-विपक्ष संघर्षाचा दाह मुख्याधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला व मुख्याधिकारी येथून सोडून गेले. त्यानंतर मागील दोन वर्षांहून अधिक काळ नगरपंचायतमध्ये ना पूर्णवेळ मुख्याधिकारी ना पदाधिकारी असून, संपूर्ण कामकाज प्रशासकाकडून केले जात होते. यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत.

नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची चर्चा होती. मात्र, प्रमोद कांबळे यांची प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सालेकसा नगरपंचायतच्या पूर्णवेळ मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, तेही या नगरपंचायतमध्ये परीविक्षाधीन कालावधीमध्ये आले आहेत. त्यांचा परीविक्षाधीन काळ संपल्यानंतर ते येथे राहणार की नाही, हे अजून सांगता येत नाही. त्यामुळे सालेकसा नगरपंचायत विकासाच्या रुळावर येणार का? किंवा नेहमीप्रमाणे चलती का नाम गाडी असेच चालेल, अशी चर्चा आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया