शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

गोंदिया-बल्लारशा मार्गावर एक धावतेय, दुसरी केव्हा धावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 17:13 IST

गोंदिया-बल्लारशा मार्गावर सध्या केवळ सकाळी ७.३० वाजताची एकच पॅसेंजर गाडी सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील इतर फेऱ्या आजही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचा सवाल एकच पॅसेंजर सुरू असल्याने अनेकांची अडचण

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भाव बंद केलेल्या पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाही. रेल्वे विभागाने महिनाभरापूर्वी गोंदिया-बल्लारशा मार्गावर दोन्ही ठिकाणाहून प्रत्येकी एकच पॅसेंजर गाडी सुरू केली आहे. एकच गाडी सुरू असल्याने प्रवाशांना कुठलाच उपयोग होत नसून उलट त्यांचा मनस्ताप वाढत आहे. त्यामुळे एक तर धावतेय दुसरी पॅसेंजर गाडी केव्हा सुरू करणार असा सवाल या मार्गावरील प्रवाशांनी केला आहे.

गोंदिया-बल्लारशा मार्गावर सध्या केवळ सकाळी ७.३० वाजताची एकच पॅसेंजर गाडी सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील इतर फेऱ्या आजही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सकाळची लोकल सुटल्यास दुसऱ्या दिवशीच जाण्याशिवाय पर्याय नाही. गोंदियासह सडक अर्जुनी, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची भिस्त या मार्गावरील पॅसेंजर रेल्वेगाड्यांवर आहे.

गोरेगाव तालुक्यातील गणखैरा, डव्वा, सटवा, पुरगाव, चिचगाव, गोरेगाव, या गावासह सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी, गोंगले, डव्वा, घोटी, खोडशिवनी, मालीजुंगा, सौंदड, गोंडउमरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव, बाराभाटी, अरुणनगर, पिंपळगाव, झरपडा या गावातील नागरिकांना जिल्हा तर गोंदियाकडे येणारी रेल्वेगाडी रात्री ८ वाजता गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर पोहोचत आहे. त्यामुळे एखाद्या प्रवाश्याला या मार्गावरील एखाद्या गावी जायचे झाल्यास परत येताना थेट रात्रीची रेल्वेगाडीच एकमात्र पर्याय आहे. मुख्यालय अथवा शेजारच्या जिल्ह्यातील वडसा येथील बाजारपेठे ये-जा करण्यासाठी या मार्गावरील पॅसेंजर रेल्वेगाड्या सोयीच्या ठरतात, पण केवळ एकच गाडी सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

'या' मार्गावर पॅसेंजर का नाही?

रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी गोंदिया-बालाघाट-कटंगी मार्गावर पूर्वीसारख्या फेऱ्या सुरू केल्या; पण गोंदिया-बल्लारशाह मार्गावरील फेऱ्या सुरू केल्या नाही. इतर गाड्या सुरू करण्यात आल्या, मग या मार्गावरील पॅसेंजर व लोकल गाड्या सुरू करण्यास नेमकी अडचण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एक्स्प्रेसचा थांबाही बंद

या मार्गावर चालणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा गोदियावरून सौंदड, अर्जुनी मोरगाव, नागभीड, मूल, चंद्रपूर या स्थानकावर देण्यात आला होता; पण सर्व सुपरफास्ट गाड्या सुरू असूनसुद्धा या स्थानकावर गाड्यांचे थांबे बंद आहे. परिणामी प्रवाशांना याचा कुठलाच लाभ होत नाही.

टॅग्स :railwayरेल्वेPublic Transportसार्वजनिक वाहतूकpassengerप्रवासी