शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण झालेल्या पुलाची दखल केव्हा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ठरत आहे.

ठळक मुद्देअनेकांना गमवावा लागला जीव : केव्हाही कोसळू शकतो कुआढास पूल

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : गडमाता मंदिर पहाडाच्या पायथ्याशी कुआढास नदीवरील पुलाची उंची फारच कमी असल्याने पावसाळ्यात केव्हाही पुलावरुन पाणी वाहते असते. पुलाला कसल्याही प्रकारचे कठडे लावले नसल्याने या पुलाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे.या पुलापासून काही अंतरावर बंधारा असून त्या बंधाऱ्यावरुन वेगाने पाणी वाहत येते. अशात हा जीर्ण झालेला पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र संबंधित विभागाने याची अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे हा पूल तयार करण्याची सद्बुध्दी प्रशासनाला केव्हा येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.सालेकसा-नानव्हा मार्गावर असलेल्या या पुलावरुन जाताना वर्षभर जीवाला धोका असतो.एकतर या पुलाची उंची कमी असून पूल अरुंद असल्याने दोन्ही दिशेने येणारे कोणतेही वाहन किंवा बैलगाड्या एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाही. अशात एकमेकाला जाण्यासाठी रस्ता सोडताना सरळ नदीत कोसळून पडण्याची भिती असते. तसेच कठडे लावले नसल्याने या पुलावरुन ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. एवढेच नव्हे तर पुलाची उंची कमी असल्याने पुलाकडे जातांना उतार भागाला तोंड द्यावे लागते. अशात वाहनावर नियंत्रण ठेऊन काळजीपूर्वक जावे लागते.एखादे चारचाकी वाहन आल्यास विरुद्ध दिशेने वाहन किंवा बैलगाडी आली की अपघाताची शंभर टक्के शक्यता असते.सालेकसा मुख्यालयी आपल्या कामानिमित्त जाण्यासाठी नानव्हा, घोन्सी, गरुटोला, बिंझली, खोलगड, भरसूला, ढिमरटोला येथील लोकांना नेहमी या पुलावरुन ये-जा करावी लागते.शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज शेकडो विद्यार्थी या पुलावरुन ये-जा करतात.परंतु प्रत्येकाला आपला जीव मुठीत घेऊन हा पूल पार करावा लागतो. ५ वर्षापूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती बाबुलाल उपराडे यांच्या पुतण्याची मोटारसायकल पूल ओलांडतांना पुलाच्या खाली गेली व तो पुरात वाहून गेला. सन २०१० मध्ये म्हसगाव येथील देवेंद्र बोपचे नावाचा इसम सायकलवरील ताबा सुटून पुलाखाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तर नानव्हा येथील केवललाल बिसेन बैलगाडीने जात असताना त्याच्या ही ताबा सुटल्याने बैलगाडीसह पुलाखाली पडला त्याचा कसाबसा जीव वाचला. परंतु बैलांचा जीव गेला. एकदा रोडरोलर या पुलावरुन चढतांना मागे घसरला व नदीत जाऊन पडला होता.या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ठरत आहे.नवीन उंच पूल तयार कराया पुलामुळे कित्येकांचा जीव गेला असल्यामुळे नवीन उंच पूल तयार करण्यात यावा म्हणून परिसरातील नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींसह शासनाकडे मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर शासनाचे लक्ष या पुलाकडे जाईल असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा