शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

जीर्ण झालेल्या पुलाची दखल केव्हा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ठरत आहे.

ठळक मुद्देअनेकांना गमवावा लागला जीव : केव्हाही कोसळू शकतो कुआढास पूल

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : गडमाता मंदिर पहाडाच्या पायथ्याशी कुआढास नदीवरील पुलाची उंची फारच कमी असल्याने पावसाळ्यात केव्हाही पुलावरुन पाणी वाहते असते. पुलाला कसल्याही प्रकारचे कठडे लावले नसल्याने या पुलाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे.या पुलापासून काही अंतरावर बंधारा असून त्या बंधाऱ्यावरुन वेगाने पाणी वाहत येते. अशात हा जीर्ण झालेला पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र संबंधित विभागाने याची अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे हा पूल तयार करण्याची सद्बुध्दी प्रशासनाला केव्हा येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.सालेकसा-नानव्हा मार्गावर असलेल्या या पुलावरुन जाताना वर्षभर जीवाला धोका असतो.एकतर या पुलाची उंची कमी असून पूल अरुंद असल्याने दोन्ही दिशेने येणारे कोणतेही वाहन किंवा बैलगाड्या एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाही. अशात एकमेकाला जाण्यासाठी रस्ता सोडताना सरळ नदीत कोसळून पडण्याची भिती असते. तसेच कठडे लावले नसल्याने या पुलावरुन ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. एवढेच नव्हे तर पुलाची उंची कमी असल्याने पुलाकडे जातांना उतार भागाला तोंड द्यावे लागते. अशात वाहनावर नियंत्रण ठेऊन काळजीपूर्वक जावे लागते.एखादे चारचाकी वाहन आल्यास विरुद्ध दिशेने वाहन किंवा बैलगाडी आली की अपघाताची शंभर टक्के शक्यता असते.सालेकसा मुख्यालयी आपल्या कामानिमित्त जाण्यासाठी नानव्हा, घोन्सी, गरुटोला, बिंझली, खोलगड, भरसूला, ढिमरटोला येथील लोकांना नेहमी या पुलावरुन ये-जा करावी लागते.शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज शेकडो विद्यार्थी या पुलावरुन ये-जा करतात.परंतु प्रत्येकाला आपला जीव मुठीत घेऊन हा पूल पार करावा लागतो. ५ वर्षापूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती बाबुलाल उपराडे यांच्या पुतण्याची मोटारसायकल पूल ओलांडतांना पुलाच्या खाली गेली व तो पुरात वाहून गेला. सन २०१० मध्ये म्हसगाव येथील देवेंद्र बोपचे नावाचा इसम सायकलवरील ताबा सुटून पुलाखाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तर नानव्हा येथील केवललाल बिसेन बैलगाडीने जात असताना त्याच्या ही ताबा सुटल्याने बैलगाडीसह पुलाखाली पडला त्याचा कसाबसा जीव वाचला. परंतु बैलांचा जीव गेला. एकदा रोडरोलर या पुलावरुन चढतांना मागे घसरला व नदीत जाऊन पडला होता.या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ठरत आहे.नवीन उंच पूल तयार कराया पुलामुळे कित्येकांचा जीव गेला असल्यामुळे नवीन उंच पूल तयार करण्यात यावा म्हणून परिसरातील नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींसह शासनाकडे मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर शासनाचे लक्ष या पुलाकडे जाईल असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा