शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

कालव्यातील अतिक्रमण विरोधी अंमलबजावणी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात मोठे व मध्यम सिंचन प्रकल्पमुळे सिंचन प्रकल्प आहेत. दोन मोठे सिंचन प्रकल्प, मध्यम प्रकल्प नऊ, लघु व इतर प्रकल्प असे एकूण १९९ प्रकल्प आहेत आहे. शासनाच्या धोरणनुसार या प्रकल्पांची उभारणीसह सिंचन विकास योजना तयार करणे अपेक्षित आहे. सदर सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा पुरविणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देप्रदूषणात वाढ : सिंचनासाठी पाणी मिळेणा, संबंधित विभागाचे दुुर्लक्ष

यशवंत मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : बाघ ईटीयाडोह पाटबंधारे विभागाच्या कार्यप्रणालीचे नियंत्रण नसल्याने या विभागाच्या कालव्यांवर काही नागरिक अतिक्रमण करीत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे यात साचून असलेल्या घाण पाणी व केरकचऱ्यामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.जिल्ह्यात मोठे व मध्यम सिंचन प्रकल्पमुळे सिंचन प्रकल्प आहेत. दोन मोठे सिंचन प्रकल्प, मध्यम प्रकल्प नऊ, लघु व इतर प्रकल्प असे एकूण १९९ प्रकल्प आहेत आहे. शासनाच्या धोरणनुसार या प्रकल्पांची उभारणीसह सिंचन विकास योजना तयार करणे अपेक्षित आहे. सदर सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा पुरविणे आवश्यक आहे. सदर सिंचन सुविधेमुळे पाण्याची पातळी वाढवून सिंचनाला अधिक उपयोगिता करून देण्याचे ध्येय शासन निश्चित करीत आहे. सिरपूर धरण, पुजारीटोला, गाढवी नदी, ईटियाडोह, कालीसरार, जिल्हा सीमेवरील संजय सरोवर या धरणाची मोठ्या प्रमाणात उपयोगिता आहे. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसह मत्स्यपालन व्यवसाय व वन्यजीव प्रकल्प वाढविण्यासाठी सिंहाचा वाटा आहे. पंरतू धरण व कालवे परिसरातील वाढत्या अतिक्रमणाने यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.आमगाव तालुक्यातील ११ गावांचा, देवरी १४, सालेकसा १७,गोंदिया १७, अर्जुनी मोरगाव १३ अश्या एकूण ८२ गाव सीमा मार्गातून कालव्यातून शेतकºयांना पाणी उपलब्ध करून देण्यात येते. सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात येते. सदर कालव्यातून पाणी उपलब्ध होत असताना ग्रामीण व शहरी भागातून जात असते.यावेळी नादुरुस्त व फुटलेले कालव्यातून पाण्याचा विसर्ग होऊन नागरिक वस्तीत जाऊन पाण्याची नासाडी होते असल्याचे निदर्शनास आहे. कालव्यांवर काही ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण केले असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग न होता ते तसेच साचून आहे. परिणामी प्रदूषणात वाढ होत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची गरज आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पpollutionप्रदूषण