शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:05 IST

२५ वर्षांपासून दुर्गम भागात देत आहेत सेवा: शासन दखल घेईना

लोकमत न्यूज नेटवरकेशोरी : बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गेल्या २५ वर्षांपासून आदिवासीबहुल अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त, दुर्गम भागात अत्यंत बिकट परिस्थितीत संपूर्ण आरोग्याची धुरा सांभाळून गट अ दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सक्षमपणे कार्यभार सांभाळत आहेत. मात्र गट ब संवर्गातील बीएएमएस वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. पण शासनाने अद्यापही त्यांची दखल न घेतल्याने त्यांचा प्रश्न कायम आहे. 

राज्यातील ७२० गट ब संवर्गातील बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांच्या पदोन्नतीच्या विषयाला घेऊन विधानसभेत अनेकदा तारांकित प्रश्न व लक्षवेधी सूचना करून याकडे लक्ष वेधण्यात आले. पण याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. कार्यवाही सुरू असल्याची सांगून दिशाभूल केली जात आहे. शासनाच्या कोणत्याही विभागात ठरावीक मुदतीनंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे नियमोलिखीत आहे. परंतु आरोग्य विभाग गट ब वैद्यकीय अधिकारी यांच्या बाबतीत दुजाभाव करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. २५ वर्षांपासून सेवेत असलेल्या गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पदोन्नती प्रस्ताव जून २०२३ पासून आरोग्य संचालक कार्यालय मुंबई येथे कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे. परंतु अजूनही त्या प्रस्तावावर कार्यवाही झाली नाही. 

आदिवासीबहुल अतिसंवेदनशील, डोंगराळ, नक्षलग्रस्त, अति दुर्गम भागात राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत अविरत आरोग्य सेवा देण्याचे काम वैद्यकीय अधिकारी गट ब करीत आहे. त्यात नियमित सेवा, सर्पदंश, अपघात रुग्ण, आकस्मिक सेवा, प्रसूती सेवा, कुटुंब नियोजन सेवा, गरजेनुसार शवविच्छेदन आदी सेवा सांभाळण्याचे कार्य वैद्यकीय अधिकारी गट ब करीत आहेत. जेव्हा जेव्हा आरोग्य विषयक आपत्कालीन व आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते तेव्हा गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांची शासनाला आठवण येते. तर जेव्हा सेवाविषयक लाभ देण्याची वेळ येते तेव्हा गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

पदोन्नतीचा लाभ त्वरित द्याआजपर्यंत अनेक गट ब वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यांना अजूनही पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात शासनाप्रति असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. शासनाने हे प्रकरण त्वरित हाताळून सेवा प्रवेश नियम आणि बिंदूना- मावली नुसार गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ द्यावा अशी मागणी महासंघाचे राज्यध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांच्या नेतृत्वात गोंदिया शाखेच्यावतीने डॉ. अमर खोब्रागडे, डॉ. प्रेमकुमार बघेले, डॉ. अमित खोडनकर, डॉ. शिवशंकर हरिणखेडे, डॉ. पिकू मंडल, डॉ. कविश्वर किरसान, डॉ. अंबर मडावी, सुरेंद्र खोब्रागडे यांनी केली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरGovernmentसरकारgondiya-acगोंदिया