शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

दहावीच्या दाखल्यावर शेरा काय असणार? विद्यार्थी, पालक संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

गोंदिया : कोरोनामुळे उशिरा का होईना इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी दाखले जमविण्याची ...

गोंदिया : कोरोनामुळे उशिरा का होईना इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी दाखले जमविण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. परंतु या दहावीच्या गुणपत्रिकेवर काय शेरा असणार? दाखल्यावर तारीख आणि महिना कोणता राहील या संभ्रमात स्वत: मुख्याध्यापकही आहेत. हीच चिंता विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सतावत आहे.

शिक्षणमंडळाने आतापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली नाही. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका काढली त्यात एप्रिल २०२१ असे नमूद आहे. परंतु दाखल्यावर तो महिना लिहायचा किंवा नाही अशा संभ्रमात मुख्याध्यापक आहेत. यामध्ये शेराचा कॉलम सुटलेला आहे. त्यामुळे काय शेरा असणार हे सांगता येत नाही. आता बोर्डाच्या सूचना आल्यावरच संभ्रम दूर होणार आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या टीसी तयार केल्या आहेत. जगभरात कोरोनाचा संकट कायम असल्याने यातून महाराष्ट्र कसा सुटणार तरीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. परंतु ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला नाही. शिक्षण मंडळाने नववीच्या आधारावर दहावीचा निकाल दिला; परंतु या निकालात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. नवव्या वर्गाला गांभीर्याने न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे या निकालाने नुकसान झाले. आता निकाल लागल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू झाली आहे. शाळा सोडणाऱ्या दाखल्यावर तारीख, महिना तसेच शेरा काय लिहायचा हा मुख्याध्यापकांना प्रश्नच पडला आहे.

................................

मुख्याध्यापक काय म्हणतात...

विद्यार्थ्यांची टीसी तयार करताना त्या टीसीवर शेरा काय लिहायचा यासाठी आता शासनाच्या सूचनांची वाट पाहावी लागेल. आमच्या शाळेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही त्यांच्या व्यवहार व वागणे यावरून शेरा लिहित होतो.

-अनिल मुरकुटे

मुख्याध्यापक, विद्या निकेतन आमगाव.

..............

दहावीची परीक्षा न देताच विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. नववीच्या आधारावर दहावीचे गुणदान करण्यात आले. परंतु टीसीवर काय शेरा लिहायचा यासंदर्भात सूचना देण्यात आल्या नाहीत. तसेच टीसीवर तारीख आणि महिना काय नमूद करावा याच्याही सूचना मिळाल्या नाहीत.

-सी.जी. पाऊलझगडे

मुख्याध्यापक, संत जयरामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठाणा.

...............

दहावीचा निकाल लागला परंतु शाळेकडून गुणपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्गात प्रवेश कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. आता सर्व विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतील तेव्हाच आपल्या मुलीलाही शाळेत प्रवेश दाखल करू.

- संतोष हुकरे पालक

..................

नववीच्या आधारावर दहावीचे गुण देण्यात आले. परंतु नववीला कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. दहावीचा निकाल लागूनही गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. कोरोनाच्या संकटाने आमच्या मुलांचे शिक्षण बुडाले. आता अकरावीच्या प्रवेशासाठी कामाला लागणार.

रामदास मेंढे, पालक

...................

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा- ३६९

दहावीतील विद्यार्थी- १९२७४

उत्तीर्ण विद्यार्थी- १९२६०

पास झालेली मुले-९८६७

पास झालेल्या मुली-९३९३

................

बोर्डाने या शेरा संदर्भात आतापर्यंत मार्गदर्शक सूचना पाठविलेल्या नाहीत. मार्गदर्शक सूचना येताच तशा सूचना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात येईल. शासन सर्व गोष्टीवर माहिती देत आहे. यावरही माहिती लवकरच देईल अशी आशा आहे.

- प्रदीप समरीत

उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प. गोंदिया.