शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

दहावीच्या दाखल्यावर शेरा काय असणार? विद्यार्थी, पालक संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

गोंदिया : कोरोनामुळे उशिरा का होईना इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी दाखले जमविण्याची ...

गोंदिया : कोरोनामुळे उशिरा का होईना इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी दाखले जमविण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. परंतु या दहावीच्या गुणपत्रिकेवर काय शेरा असणार? दाखल्यावर तारीख आणि महिना कोणता राहील या संभ्रमात स्वत: मुख्याध्यापकही आहेत. हीच चिंता विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सतावत आहे.

शिक्षणमंडळाने आतापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली नाही. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका काढली त्यात एप्रिल २०२१ असे नमूद आहे. परंतु दाखल्यावर तो महिना लिहायचा किंवा नाही अशा संभ्रमात मुख्याध्यापक आहेत. यामध्ये शेराचा कॉलम सुटलेला आहे. त्यामुळे काय शेरा असणार हे सांगता येत नाही. आता बोर्डाच्या सूचना आल्यावरच संभ्रम दूर होणार आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या टीसी तयार केल्या आहेत. जगभरात कोरोनाचा संकट कायम असल्याने यातून महाराष्ट्र कसा सुटणार तरीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. परंतु ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला नाही. शिक्षण मंडळाने नववीच्या आधारावर दहावीचा निकाल दिला; परंतु या निकालात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. नवव्या वर्गाला गांभीर्याने न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे या निकालाने नुकसान झाले. आता निकाल लागल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू झाली आहे. शाळा सोडणाऱ्या दाखल्यावर तारीख, महिना तसेच शेरा काय लिहायचा हा मुख्याध्यापकांना प्रश्नच पडला आहे.

................................

मुख्याध्यापक काय म्हणतात...

विद्यार्थ्यांची टीसी तयार करताना त्या टीसीवर शेरा काय लिहायचा यासाठी आता शासनाच्या सूचनांची वाट पाहावी लागेल. आमच्या शाळेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही त्यांच्या व्यवहार व वागणे यावरून शेरा लिहित होतो.

-अनिल मुरकुटे

मुख्याध्यापक, विद्या निकेतन आमगाव.

..............

दहावीची परीक्षा न देताच विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. नववीच्या आधारावर दहावीचे गुणदान करण्यात आले. परंतु टीसीवर काय शेरा लिहायचा यासंदर्भात सूचना देण्यात आल्या नाहीत. तसेच टीसीवर तारीख आणि महिना काय नमूद करावा याच्याही सूचना मिळाल्या नाहीत.

-सी.जी. पाऊलझगडे

मुख्याध्यापक, संत जयरामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठाणा.

...............

दहावीचा निकाल लागला परंतु शाळेकडून गुणपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्गात प्रवेश कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. आता सर्व विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतील तेव्हाच आपल्या मुलीलाही शाळेत प्रवेश दाखल करू.

- संतोष हुकरे पालक

..................

नववीच्या आधारावर दहावीचे गुण देण्यात आले. परंतु नववीला कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. दहावीचा निकाल लागूनही गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. कोरोनाच्या संकटाने आमच्या मुलांचे शिक्षण बुडाले. आता अकरावीच्या प्रवेशासाठी कामाला लागणार.

रामदास मेंढे, पालक

...................

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा- ३६९

दहावीतील विद्यार्थी- १९२७४

उत्तीर्ण विद्यार्थी- १९२६०

पास झालेली मुले-९८६७

पास झालेल्या मुली-९३९३

................

बोर्डाने या शेरा संदर्भात आतापर्यंत मार्गदर्शक सूचना पाठविलेल्या नाहीत. मार्गदर्शक सूचना येताच तशा सूचना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात येईल. शासन सर्व गोष्टीवर माहिती देत आहे. यावरही माहिती लवकरच देईल अशी आशा आहे.

- प्रदीप समरीत

उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प. गोंदिया.