शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

बजेटमध्ये बेराेजगारांसाठी काय रे भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST

गोंदिया : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाच्या संकटानंतर हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने याकडे ...

गोंदिया : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाच्या संकटानंतर हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने याकडे सर्वसामान्यांचे सर्वाधिक लक्ष लागले होते. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला, छोटे-मोठे व्यवसाय डबघाईस आले. त्यामुळे अनेकांना रोजगार शोधण्याची वेळ आली. मागील वर्षभरापासून कुठलीच नोकर भरती नसल्याने हजारो बेरोजगार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांना या अर्थसंकल्पाकडून रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा होती. मात्र, तशी कुठलीच तरतूद नसल्याने बेरोजगारांची निराशा झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याने महागाईत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका पुन्हा सर्वसामान्य नागरिकांनाच बसणार आहे. तर महिला सुरक्षेच्या दृष्टीने अर्थसंकल्पात कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी बजेटवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून, बेरोजगारांसाठी काय रे भाऊ, असा सवाल केला आहे.

.......

केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे. उज्ज्वला योजनेचा लाभ एक कोटी गरीब कुटुंबांना होईल; परंतु गृहिणींच्या हितासाठी किंवा समाजातील घटकांचा विकास होईल असे काहीच या अर्थसंकल्पात मांडण्यात आले नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाने गृहिणींची निराशा झाली आहे. - माया शिवणकर, गृहिणी, आमगाव.

....

आत्मनिर्भर भारतच्या नावावर लोकांना भ्रमित केले जात आहे. कोरोनाच्या संकटाने महागाई वाढली. महागाई सतत वाढतच असताना सर्वसामान्यांना या बजेटचा काहीच फायदा होणार नाही.

- रवींद्र गायधने, दागोटोला

....

सरकारने खासगी नोकरांसाठी या अर्थसंकल्पात विशेष असे काहीच केले नाही. कोरोनामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला; परंतु त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापेक्षा सरकार अनेक सरकारी यंत्रणा खासगी करीत आहे. खासगी नोकरदारांसाठी बजेट नव्हता.

-हरिष भुते, खासगी नोकरदार

...

शेतासाठी लागणारे खते, बियाणे व शेती उपयोगी अवजारांची किंमत वाढल्याने शेतकऱ्यांना रडविणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांच्या विरोधी कामे केंद्र शासन करीत असून, शेतकऱ्यांच्या फायद्याचे गोडवे गाणाऱ्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे बजेटमध्ये दुर्लक्ष केले आहे.

-भरतलाल हुकरे, शेतकरी.

....

ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरण्याची गरज नाही, हे अर्थसंकल्पात चांगले करण्यात आले; परंतु ७५ वर्षे ओलांडणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्नच नाहीच्या बरोबरीत असते. यामुळे या अर्थसंकल्पाचे आकर्षण पाहिजे तेवढे नाही. केवळ आवळा देऊन कोवळा काढणारा हा अर्थसंकल्प आहे.

-भिवाजी खोटेले ज्येष्ठ नागिरक, सडक- अर्जुनी

....

व्यापारात मोठी मंदी आहे. कोरोनाने अनेकांचा व्यवसाय बुडाला. त्या व्यावसायिकांना या अर्थसंकल्पात मदत करणे आवश्यक होते; परंतु केंद्र सरकारने मध्यम किंवा छोट्या व्यापाऱ्यांसाठी भरघोस असे काहीच केले नाही.

- राजकुमार फुंडे, व्यापारी.

....

पेट्रोल, डिझेलची वाढणारी किंमत, लोकांकडे वाढणाऱ्या वाहनांची संख्या पाहता आमचा व्यवसाय मोडकळीस आला आहे. पेट्रोल, डिझेलची किंमत तर वाढत आहे; परंतु भाडे वाढ न झाल्याने आम्ही पोट कसे भरावे हे संकट आमच्यासमोर आहे.

राध्येश्याम बहेकार, ऑटो चालक

......

बेरोजगारांना निराश करणारा अर्थसंकल्प आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला; परंतु केंद्र सरकारने रोजगाराच्या संधी दिल्या नाही. केवळ आधुनिकीकरणाच्या नावावर बेरोजगारांना भूलथापा दिल्या जात आहेत. या अर्थसंकल्पात बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी नाहीत.

नरेश बोहरे युवक रिसामा.

.....

भाजीपाला विक्री करताना शेतीच्या उत्पन्नावर शेतमालाची किंमत ठरते. उत्पादन मालाच्या तुलनेत मागणी किती आणि पुरवठा किती यावर त्या मालाची किंमत ठरते. शेती उपयोगी संसाधनांची किंमत वाढल्याने शेतमालावर निश्चितच परिणाम पडेल. हा बजेट आमच्यासाठी हिताचा नाही.

-प्रेमानंद पाथोडे, भाजीविक्रेता.

.......

डिझेल आणि पेट्रोलवर ३६ रुपये केंद्र शासनाचे, तर राज्य शासनाचे २६ रुपये कर आहे. एक कर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सामान्याच्या हे आवाक्याबाहेर आहे.

- मुकेश अग्रवाल पेट्रोल पंप चालक

...........

बस स्थानकावर अर्थसंकल्पाची चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यावर येथील मरारटोली येथील बसस्थानकावर प्रवाशांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी अर्थसंकल्पात काय, शेतकऱ्यांसाठी कुठली तरतूद करण्यात आली, पेट्रोल, डिझेलवर कृषी सेस लावल्याने दरवाढीचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल, याची चर्चा करताना प्रवासी आढळले.

........

रेल्वे स्थानक

अर्थसंकल्पात नवीन रेल्वेगाड्यांची घोषणा होते काय, रेल्वे भाड्यात कपात होते काय, यासंबंधीची चर्चा गोंदिया रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये होती. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावरील सर्व कुलीसुद्धा एकत्रित बसून या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी कुठलीच तरतूद न करण्यात आल्याने त्यावर चर्चा करीत होते. तर नवीन रेल्वेगाड्यांची घोषणा न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.