शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

इतर गावांना प्रेरणास्पद गाव बनवू

By admin | Updated: December 7, 2014 22:54 IST

तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात ग्राम स्वच्छता अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिदिन व जागतिक अपंग सप्ताहाची सांगता शनिवारी ६ डिसेंबरला करण्यात आली. यावेळी तिरोडा

सर्वधर्मसमभाव : ग्राम स्वच्छता अभियान व अपंग सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची रॅलीगोंदिया : तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात ग्राम स्वच्छता अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिदिन व जागतिक अपंग सप्ताहाची सांगता शनिवारी ६ डिसेंबरला करण्यात आली. यावेळी तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश टेंभरे यांनी इतर गावांना प्रेरणा घ्यावीच लागेल, असे आदर्श चिरेखनी गाव बनवू, असा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक महिन्यात गावात स्वच्छता अभियान राबवू, असा निर्धार व्यक्त करणाऱ्या चिरेखनीच्या ग्रामस्थांनी ६ डिसेंबरला दुसऱ्यांदा गावात स्वच्छता अभियान राबविले. सर्वप्रथम सकाळी ७ वाजता ग्राम स्वच्छता अभियानाची सुरूवात हनुमान मंदिरापासून करण्यात आली. यानंतर वार्ड-३, नंतर वार्ड-१ व यानंतर वार्ड-२ मध्ये स्वच्छता करून सर्व ग्रामस्थांनी गावातील केरकचरा व घाण स्वच्छ करून दोन ट्रॉल्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली. यानंतर नालंदा बुद्ध विहार व जि.प. पूर्व माध्यमिक शाळा परिसरातील केरकचरा व घाण स्वच्छ करण्यात आली. यावेळी गाव स्वच्छ, सुंदर व आजारमुक्त रहावे यासाठी सर्वच ग्रामस्थांनी सदर अभियानात पुढाकार घेवून आपण जागृत नागरिक असल्याचे दर्शन घडवून दिले. यात प्रामुख्याने कृउबासचे संचालक रमेश टेंभरे, सुरेंद्र कोटांगले, भोजराज पटले, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवचंद रिनाईत, तिरोडा पं.स. चे सभापती ललिता जांभूळकर, अंतुलाल पारधी, इंदल बिसेन, गेंदलाल पारधी, उदेलाल पारधी, गोपीचंद रिनाईत, माजी सरपंच उमेंद्र पारधी, घनश्याम जांभूळकर, भावराव कोटांगले, उपसरपंच सोनू पारधी, सुभाष जांभूळकर, खेमू रिनाईत आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.यानंतर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा चिरेखनीच्या वतीने ३ ते ९ डिसेंबरपर्यंत असलेल्या अपंग सप्ताहानिमित्त गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. विविध घोषणा देत विद्यार्थ्यांची रॅली नालंदा बुद्ध विहार ते हनुमान मंदिर व शिवमंदिराकडून शाळेत परतली. यानंतर शाळेत विद्यार्थ्यांना अपंग सप्ताह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य या दोन्ही विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. लहानसहान विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. यावेळी पं.स. सभापती ललिता जांभूळकर, सरपंच जगन्नाथ पारधी, मुख्याध्यापक कटरे, शिक्षक मनोज गेडाम, मनोज जांभूळकर, व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक उपस्थित होते. यानंतर सायंकाळी ६ वाजता नालंदा बुद्धविहारात गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक शहारे होते. अतिथी म्हणून पं.स. सभापती ललिता जांभूळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवचरण शहारे, डॉ. मेकचंद शहारे, दलितमित्र प्रल्हाद जांभूळकर, प्रमोद शहारे, भावराव कोटांगले, ग्रा.पं. सदस्य करूणा जांभूळकर, शिक्षक शैलेंद्र कोचे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी सुरेंद्र कोटांगले, घनश्याम जांभूळकर, सुभाष जांभूळकर, किशोर सरोजकर, सुखचंद जांभूळकर, आशिष शहारे, सर्व समाजबांधव व ग्रामस्थांनी सहकार्य केले. सदर तिन्ही कार्यक्रमात गावकरी बंधू-भगिनींनी एकत्र येऊन सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून दिला. (प्रतिनिधी)