शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

वैनगंगेचे पाणी आटण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 12, 2016 01:55 IST

डांगोर्लीजवळील वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह न राहिल्यामुळे आता गुरूवारपासून संपूर्ण शहरात केवळ सकाळी ६.३० ते ७ वाजतापर्यंत नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

पेयजलाची समस्या : आजपासून ‘वन टाईम’ पाणी पुरवठागोंदिया : डांगोर्लीजवळील वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह न राहिल्यामुळे आता गुरूवारपासून संपूर्ण शहरात केवळ सकाळी ६.३० ते ७ वाजतापर्यंत नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे जे पाणी वितरण शहराला दोन्ही वेळा केला जात होता, त्यात आता कपात केली जात आहे.दुष्काळाचा प्रभाव संपूर्ण राज्यात मागील एक महिन्यापासून दिसत आहे. आता तो प्रभाव गोंदिया जिल्ह्यातही दिसू लागला आहे. गोंदियासह तिरोडा शहरातही पाणी पुरवठा करण्यात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याची कपात न करण्यासाठी वैनगंगा नदीवर बंधारा बनविला होता. परंतु तो बंधारा बिनकामाचा ठरला. वैनगंगा नदीच्या आत जी विहीर बनली आहे, त्यात पाण्याचा साठा कमी होत आहे. याच प्रमुख कारणामुळे शहरात पाण्याची कपात केली जात आहे.दरवर्षी मे महिन्यात गोंदिया शहरात पाण्याची टंचाई उद्भवते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे मे महिन्यात विहिरीत पाण्याच्या कमी होणारा साठा वाढविण्यासाठी कसलाही निर्णय घेण्यात आला नाही. सद्यस्थितीत बनविण्यात आलेल्या बंधाऱ्यात हव्या त्या प्रमाणात साठा होत नाही. याच बंधाऱ्यासारखे आणखी काही बंधारे नदीमध्ये जर बनविण्यात आले तर विहिरीत पाणी साठा वाढू शकेल. तसेच सध्या बनविण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या सभोवारची रेती हटविण्यात आली तर या बंधाऱ्यात पुढी वर्षी पाण्याचा साठा अधिक होवू शकेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैनगंगा नदीच्या आत जी विहीर आहे तिची क्षमता १८ एमएलची आहे. त्याद्वारे शहराच्या पाचही पाणी टाक्यांमध्ये पाणी भरले जावू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की एक एमएल म्हणजे १० लाख लिटर होते. याचा अर्थ सद्यस्थितीत विहिरीला दोष दिले जावू शकत नाही. ही विहीर १८० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याची क्षमता ठेवते. शहरात पाणी जे सकाळच्या वेळी अर्ध्या तासासाठी दिले जाते, त्याच्य बरोबर वितरणासाठी शहरवासियांनी घरांमध्ये टुल्लू पंपांचे वापर करू नये, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी केले आहे.