पेयजलाची समस्या : आजपासून ‘वन टाईम’ पाणी पुरवठागोंदिया : डांगोर्लीजवळील वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह न राहिल्यामुळे आता गुरूवारपासून संपूर्ण शहरात केवळ सकाळी ६.३० ते ७ वाजतापर्यंत नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे जे पाणी वितरण शहराला दोन्ही वेळा केला जात होता, त्यात आता कपात केली जात आहे.दुष्काळाचा प्रभाव संपूर्ण राज्यात मागील एक महिन्यापासून दिसत आहे. आता तो प्रभाव गोंदिया जिल्ह्यातही दिसू लागला आहे. गोंदियासह तिरोडा शहरातही पाणी पुरवठा करण्यात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याची कपात न करण्यासाठी वैनगंगा नदीवर बंधारा बनविला होता. परंतु तो बंधारा बिनकामाचा ठरला. वैनगंगा नदीच्या आत जी विहीर बनली आहे, त्यात पाण्याचा साठा कमी होत आहे. याच प्रमुख कारणामुळे शहरात पाण्याची कपात केली जात आहे.दरवर्षी मे महिन्यात गोंदिया शहरात पाण्याची टंचाई उद्भवते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे मे महिन्यात विहिरीत पाण्याच्या कमी होणारा साठा वाढविण्यासाठी कसलाही निर्णय घेण्यात आला नाही. सद्यस्थितीत बनविण्यात आलेल्या बंधाऱ्यात हव्या त्या प्रमाणात साठा होत नाही. याच बंधाऱ्यासारखे आणखी काही बंधारे नदीमध्ये जर बनविण्यात आले तर विहिरीत पाणी साठा वाढू शकेल. तसेच सध्या बनविण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या सभोवारची रेती हटविण्यात आली तर या बंधाऱ्यात पुढी वर्षी पाण्याचा साठा अधिक होवू शकेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैनगंगा नदीच्या आत जी विहीर आहे तिची क्षमता १८ एमएलची आहे. त्याद्वारे शहराच्या पाचही पाणी टाक्यांमध्ये पाणी भरले जावू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की एक एमएल म्हणजे १० लाख लिटर होते. याचा अर्थ सद्यस्थितीत विहिरीला दोष दिले जावू शकत नाही. ही विहीर १८० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याची क्षमता ठेवते. शहरात पाणी जे सकाळच्या वेळी अर्ध्या तासासाठी दिले जाते, त्याच्य बरोबर वितरणासाठी शहरवासियांनी घरांमध्ये टुल्लू पंपांचे वापर करू नये, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी केले आहे.
वैनगंगेचे पाणी आटण्याच्या मार्गावर
By admin | Updated: May 12, 2016 01:55 IST