शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेचे पाणी आटण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 12, 2016 01:55 IST

डांगोर्लीजवळील वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह न राहिल्यामुळे आता गुरूवारपासून संपूर्ण शहरात केवळ सकाळी ६.३० ते ७ वाजतापर्यंत नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

पेयजलाची समस्या : आजपासून ‘वन टाईम’ पाणी पुरवठागोंदिया : डांगोर्लीजवळील वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह न राहिल्यामुळे आता गुरूवारपासून संपूर्ण शहरात केवळ सकाळी ६.३० ते ७ वाजतापर्यंत नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे जे पाणी वितरण शहराला दोन्ही वेळा केला जात होता, त्यात आता कपात केली जात आहे.दुष्काळाचा प्रभाव संपूर्ण राज्यात मागील एक महिन्यापासून दिसत आहे. आता तो प्रभाव गोंदिया जिल्ह्यातही दिसू लागला आहे. गोंदियासह तिरोडा शहरातही पाणी पुरवठा करण्यात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याची कपात न करण्यासाठी वैनगंगा नदीवर बंधारा बनविला होता. परंतु तो बंधारा बिनकामाचा ठरला. वैनगंगा नदीच्या आत जी विहीर बनली आहे, त्यात पाण्याचा साठा कमी होत आहे. याच प्रमुख कारणामुळे शहरात पाण्याची कपात केली जात आहे.दरवर्षी मे महिन्यात गोंदिया शहरात पाण्याची टंचाई उद्भवते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे मे महिन्यात विहिरीत पाण्याच्या कमी होणारा साठा वाढविण्यासाठी कसलाही निर्णय घेण्यात आला नाही. सद्यस्थितीत बनविण्यात आलेल्या बंधाऱ्यात हव्या त्या प्रमाणात साठा होत नाही. याच बंधाऱ्यासारखे आणखी काही बंधारे नदीमध्ये जर बनविण्यात आले तर विहिरीत पाणी साठा वाढू शकेल. तसेच सध्या बनविण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या सभोवारची रेती हटविण्यात आली तर या बंधाऱ्यात पुढी वर्षी पाण्याचा साठा अधिक होवू शकेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैनगंगा नदीच्या आत जी विहीर आहे तिची क्षमता १८ एमएलची आहे. त्याद्वारे शहराच्या पाचही पाणी टाक्यांमध्ये पाणी भरले जावू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की एक एमएल म्हणजे १० लाख लिटर होते. याचा अर्थ सद्यस्थितीत विहिरीला दोष दिले जावू शकत नाही. ही विहीर १८० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याची क्षमता ठेवते. शहरात पाणी जे सकाळच्या वेळी अर्ध्या तासासाठी दिले जाते, त्याच्य बरोबर वितरणासाठी शहरवासियांनी घरांमध्ये टुल्लू पंपांचे वापर करू नये, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी केले आहे.