शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

तहसीलदारांनी केले जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देइटियाडोह धरण ओव्हरफ्लो : पर्यटकांना पर्वणी, शेतकऱ्यांत आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : सर्वदूर प्रसिद्ध असलेले इटियाडोह धरण तब्बल सहा वर्षांनंतर मंगळवारी (दि.३) सकाळी ४ वाजता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून दोन इंच पाणी वाहत असल्याचे विहंगम दृश्य डोळ््यांचे पारणे फेडण्यासारखेच आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजन करण्याची येथे प्रथा आहे. त्यानुसार, तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सकाळी १० वाजता शासकीय जलपूजन केले.धरण ओव्हर फ्लो होण्याची पर्यटकांसह सर्वांनाच प्रतीक्षा असते. यावर्षी झालेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यापूर्वी सन २०१३ मध्ये धरणे ओव्हरफ्लो झाले होता. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हरितक्र ांतीचे स्वप्न साकार करणारे इटियाडोह धरण केव्हा ओव्हरफ्लो होते याची शेतकºयांना आस असते. या धरणाच्या पाण्यामुळे शेतीला सिंचन होत असते. धरणात अधिकचा पाणीसाठा झाल्यानंतर दुबार धानपीक घेतले जाते. त्यामुळे शेतकरी वर्गातही आनंद व्यक्त केला जात आहे.दरम्यान, धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी इटियाडोह पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अभियंता दिपक भिवगडे, शाखा अभियंता हितेश लंजे, कालवा निरीक्षक एम. आर. ढोक, तलाठी पुंडलीक कुंभरे, विनोद राऊत, पतीराम राणे उपस्थित होते.गावांना सर्तकतेचा इशाराधरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गाढवी नदी फुगते. त्यामुळे नदीकाठावरील गावांना पुराचा धोका संभवतो. पुष्पनगर (अ) व (ब), वडेगावबंध्या, बोरी, चिचोली, करांडली, खोकरी, दिनकरनगर, सावरी, खोळदा, जरु घाटा, सुरबन या गावांना अधिक भीती असते. प्रशासनाने तशा सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. ओव्हरफ्लो होताच पर्यटकांनी गर्दी केली होती. उत्सुकतेपोटी पर्यटक पाण्यात उतरतात अशावेळी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पTahasildarतहसीलदार