शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

सडक अर्जुनी तालुक्यात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:13 IST

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद : बंधाऱ्यातही पाणी नाही

राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण भागात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या कायम आहे. पिपरी, राका, खोबा, खडकी, मोगरा, राजगुडा, पळसगाव, दोडके, सडक अर्जुनी, डुंडा, खजरी, आपकारीटोला, परसोडी, कुंभारटोली, मुंढरीटोला, माताटोली, कनेरी/राम, हत्तीमारेटोला, केसलवाडा, सितेपार, मालीजुंगा, डोंगरगाव/डेपो, सालेधारणी, पुतळी, राकाटोली, चिंगी, गिरोला या गावातील विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला आहे. परिणामी गावकऱ्यांना दोन ते कि.मी.अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. तर पाणी आणण्यासाठी गावातील महिलांची भल्या पहाटेपासून लगबग सुरू होत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. गावातील पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत पंचायत समितीला अहवाल सुध्दा पाठविण्यात आला.मात्र पंचायत समितीने दोन दिवसांपूर्वी जि.प.कडे बोअरवेल दुरूस्तीसाठी साहित्याची मागणी केल्याची माहिती आहे. त्यावरुन पाणी टंचाईच्या समस्येवर प्रशासन किती गंभीर आहे हे दिसून येते. पंचायत समितीने तालुक्याचे पिण्याचे पाण्याचे नियोजन फेब्रुवारी महिन्यातच करायला पाहिजे होते. पण ते न केल्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.बंधाऱ्यांनी गाठला तळशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे तालुक्यातील बांधण्यात आलेल्या बंधाºयात एक थेंबही पाणी शिल्लक नाही. तालुक्यात सिंचनासाठी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो. मात्र पाण्याचे पुनर्भरण करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यात पाणी समस्या पेटली आहे. १५ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुतळी ही १६ गावे व २० वाड्यांना पाणी देणारी योजना अधिकाऱ्यांच्या नियोजनाचे अभावामुळे आज बंद पडली आहे.साडेआठशे बोअरवेल आणिसाडेचारशे विहिरीसडक अर्जुनी तालुक्याची लोकसंख्या १ लाख ७ हजार ८९३ आहे. तर एकूण १०८ गावे आहेत.त्यापैकी ८ रिठी गावे तर १०० महसूली गावे आहेत. त्यात ४२ स्वतंत्र ग्रामपंचायत तर २१ गट ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ८५७ विंधन विहिरीची सोय आहे. शासकीय विहिरी ४५३ आहेत. या शासकीय विहिरी जवळ जवळ कोरड्याच पडल्या आहेत. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे विहिरींना पाणीच नाही. गावाशेजारी रबी धान पिके घेतले जात असल्याने त्याचा सुध्दा भूजल पातळीवर परिणाम झाल्याचे बोलल्या जाते. भुसारीटोला येथे गावकऱ्यांच्या सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे गाव शेजारी उन्हाळी धान न लावण्याचा संकल्प केल्याने गावात सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या नसल्याची माहिती ग्रामसेवकाने दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई