शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

सडक अर्जुनी तालुक्यात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:13 IST

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद : बंधाऱ्यातही पाणी नाही

राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण भागात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या कायम आहे. पिपरी, राका, खोबा, खडकी, मोगरा, राजगुडा, पळसगाव, दोडके, सडक अर्जुनी, डुंडा, खजरी, आपकारीटोला, परसोडी, कुंभारटोली, मुंढरीटोला, माताटोली, कनेरी/राम, हत्तीमारेटोला, केसलवाडा, सितेपार, मालीजुंगा, डोंगरगाव/डेपो, सालेधारणी, पुतळी, राकाटोली, चिंगी, गिरोला या गावातील विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला आहे. परिणामी गावकऱ्यांना दोन ते कि.मी.अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. तर पाणी आणण्यासाठी गावातील महिलांची भल्या पहाटेपासून लगबग सुरू होत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. गावातील पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत पंचायत समितीला अहवाल सुध्दा पाठविण्यात आला.मात्र पंचायत समितीने दोन दिवसांपूर्वी जि.प.कडे बोअरवेल दुरूस्तीसाठी साहित्याची मागणी केल्याची माहिती आहे. त्यावरुन पाणी टंचाईच्या समस्येवर प्रशासन किती गंभीर आहे हे दिसून येते. पंचायत समितीने तालुक्याचे पिण्याचे पाण्याचे नियोजन फेब्रुवारी महिन्यातच करायला पाहिजे होते. पण ते न केल्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.बंधाऱ्यांनी गाठला तळशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे तालुक्यातील बांधण्यात आलेल्या बंधाºयात एक थेंबही पाणी शिल्लक नाही. तालुक्यात सिंचनासाठी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो. मात्र पाण्याचे पुनर्भरण करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यात पाणी समस्या पेटली आहे. १५ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुतळी ही १६ गावे व २० वाड्यांना पाणी देणारी योजना अधिकाऱ्यांच्या नियोजनाचे अभावामुळे आज बंद पडली आहे.साडेआठशे बोअरवेल आणिसाडेचारशे विहिरीसडक अर्जुनी तालुक्याची लोकसंख्या १ लाख ७ हजार ८९३ आहे. तर एकूण १०८ गावे आहेत.त्यापैकी ८ रिठी गावे तर १०० महसूली गावे आहेत. त्यात ४२ स्वतंत्र ग्रामपंचायत तर २१ गट ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ८५७ विंधन विहिरीची सोय आहे. शासकीय विहिरी ४५३ आहेत. या शासकीय विहिरी जवळ जवळ कोरड्याच पडल्या आहेत. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे विहिरींना पाणीच नाही. गावाशेजारी रबी धान पिके घेतले जात असल्याने त्याचा सुध्दा भूजल पातळीवर परिणाम झाल्याचे बोलल्या जाते. भुसारीटोला येथे गावकऱ्यांच्या सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे गाव शेजारी उन्हाळी धान न लावण्याचा संकल्प केल्याने गावात सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या नसल्याची माहिती ग्रामसेवकाने दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई