शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराने दुष्काळावर मात

By admin | Updated: January 29, 2015 23:10 IST

राज्यातील वेगवेगळ्या भागात दरवर्षी दुष्काळ पडतो. लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

गोंदिया : राज्यातील वेगवेगळ्या भागात दरवर्षी दुष्काळ पडतो. लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.गोंदिया तालुक्यातील खर्रा येथे जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, खर्रा सरपंच सुषमा पंधरे यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या विविध योजना हाती घेण्यात येत आहे पाणीटंचाईच्या भागात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. भूगर्भात पाण्याची साठवणूक होण्यासाठी सिमेंट नाल्याची साखळी बांधण्यात येईल. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल.जलयुक्त शिवार अभियान हे अत्यंत चांगले अभियान असल्याचे सांगुन पालकमंत्री बडोले म्हणाले, याचे यश प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून आहे. असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जी कामे करण्याची आवश्यकता आहे त्या कामांची निवड ग्रामसभांनी करावी. त्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जलसंधारणाच्या विविध योजना राबविणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच खर्रा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलावांच्या या जिल्ह्यात हे अभियान लोकसहभागातून यशस्वी होईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी मानले.