शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वसतिगृहाला होतोय टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: February 4, 2015 23:17 IST

क्षेत्रातील आदिवासी मुलींना राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून आदिवासी विभागातर्फे मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येकी अडीच कोटी रुपये खर्चुन दोन वसतीगृहांचे बांधकाम करण्यात आले आहे.

देवरी : क्षेत्रातील आदिवासी मुलींना राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून आदिवासी विभागातर्फे मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येकी अडीच कोटी रुपये खर्चुन दोन वसतीगृहांचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु सुरूवातिपासूनच या वसतीगृहात पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे व विभागीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही या वस्तीगृहाला सकाळी व सायंकाळी खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.सन २०१२ मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या वसतीगृहाला जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे उद्घाटनाकरीता तब्बल दोन वर्ष वाट पाहावी लागली. अखेर १० जानेवारी २०१४ मध्ये खासदार मारोतराव कोवासे व माजी आमदार रामरतन राऊत यांच्या हस्ते या वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्घाटनकरुन त्याचे श्रेय लाटणाऱ्या जनप्रतिनिधिंनी या वस्तीगृहाच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले. तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे ५०० रुपये टँकरच्या दराने दररोज तीन ते चार टँकर पाणी मागवून आदिवासी मुलींना पाण्याची सोय केली जात आहे. सध्या या दोन्ही वसतीगृहात १९० मुली राहत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या १९० मुलींकरीता दररोज दोन हजार रुपये खर्चुन पाणी टँकरने मागविण्यात येत आहे. परंतु प्रकल्प कार्यालयाद्वारे पर्यायी व्यवस्थेचा मार्ग काढल्या जात नसल्याचे बघायला मिळत आहे. वसतीगृहासमोर फार मोठी विहीर बांधली आहे, परंतु त्या विहिरीत पाणीच नाही. विशेष म्हणजे आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून सर्व विभागांना कोट्यवधींच्या योजना पुरविल्या जातात. परंतु स्वत:च्या कार्यालयांतर्गत वस्तीगृहाला पाण्याचे नियोजन करण्यात विभाग अपयशी ठरत आहे. (प्रतिनिधी)