शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

गोंदियावासीयांवर यंदाही पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:13 IST

उन्हाळ्याला सुरूवात होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याची झळ आतापासून बसायला सुरूवात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी पातळीत घट झाल्याने अधेमधे पाणी कपात करण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देआतापासून पाणीपुरवठ्यात कपात : पातळीत घट झाल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याची झळ आतापासून बसायला सुरूवात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी पातळीत घट झाल्याने अधेमधे पाणी कपात करण्यास सुरूवात केली. त्यामुळे उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.गोंदियापासून १८ कि.मी.अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे शहरात ४० हजारावर ग्राहक आहेत.त्यांना प्रती व्यक्ती १३५ लीटर याप्रमाणे दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील महिनाभरापासून शहरवासीयांना अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे.पावसाळा संपत असतानाच अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यंदा परतीचा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र आत्तापासूनच कोरडे पडले आहे.परिणामी नदीवर पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विहिरींची पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे.यंदा प्रथमच आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळी घट झाल्याने पुढील तीन चार महिने कठीण असल्याचे सांगितले. मागीलवर्षी सुद्धा शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. तीच परिस्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागातही समस्याजिल्ह्यातील सडक अर्जुनी, तिरोडा तालुक्यातील आठ ते दहा गावांमध्ये आत्तापासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.पुजारीटोला धरणावर भिस्तमागीलवर्षी शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने गोंदियापासून ८० किमी अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून नहराव्दारे पाणी आणून पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा सुद्धा पुन्हा तोच प्रयोग करावा लागणार असून त्यादृष्टीने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने पाऊले उचलल्याची माहिती आहे.

टॅग्स :Damधरण