शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियावासीयांवर यंदाही पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:13 IST

उन्हाळ्याला सुरूवात होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याची झळ आतापासून बसायला सुरूवात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी पातळीत घट झाल्याने अधेमधे पाणी कपात करण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देआतापासून पाणीपुरवठ्यात कपात : पातळीत घट झाल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याची झळ आतापासून बसायला सुरूवात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी पातळीत घट झाल्याने अधेमधे पाणी कपात करण्यास सुरूवात केली. त्यामुळे उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.गोंदियापासून १८ कि.मी.अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे शहरात ४० हजारावर ग्राहक आहेत.त्यांना प्रती व्यक्ती १३५ लीटर याप्रमाणे दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील महिनाभरापासून शहरवासीयांना अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे.पावसाळा संपत असतानाच अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यंदा परतीचा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र आत्तापासूनच कोरडे पडले आहे.परिणामी नदीवर पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विहिरींची पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे.यंदा प्रथमच आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळी घट झाल्याने पुढील तीन चार महिने कठीण असल्याचे सांगितले. मागीलवर्षी सुद्धा शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. तीच परिस्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागातही समस्याजिल्ह्यातील सडक अर्जुनी, तिरोडा तालुक्यातील आठ ते दहा गावांमध्ये आत्तापासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.पुजारीटोला धरणावर भिस्तमागीलवर्षी शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने गोंदियापासून ८० किमी अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून नहराव्दारे पाणी आणून पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा सुद्धा पुन्हा तोच प्रयोग करावा लागणार असून त्यादृष्टीने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने पाऊले उचलल्याची माहिती आहे.

टॅग्स :Damधरण