शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

तालुक्यात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:04 IST

मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने यंदा पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार हे स्पष्ट होते. मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्याने तालुक्यातील जनतेला तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती : प्रशासनाचे दुर्लक्ष भोवले

राजेश मुनीश्वरलोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने यंदा पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार हे स्पष्ट होते. मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्याने तालुक्यातील जनतेला तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पहाटेपासूनच महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र तालुक्यात ठिकठिकाणी पाहयला मिळत आहे.तालुक्यात मागील वर्षी केवळ ५७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच तालुक्याची भूजल पातळी खालावली होती. त्यानंतर भूजल पातळीत सातत्याने होत घट होत असल्याने तालुक्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा भूजल पातळीचा अहवाल जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला होता. यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईचीे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र प्रशासनाने ही बाब गांर्भियाने न घेतल्याने तालुकावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील वडेगाव, परसोडी, खजरी, म्हसवानी, बोथली, खोडशिवनी, डोंगरगाव, डव्वा, पांढरी, कोसमतोंडी, मुरपार, लेंडेझरी, पळसगाव, भुसारीटोला झुरकुटोला, पाटेकुर्रा, डोमेटोला, मनेरी, कनेरीे, चिखली, राका, कोसबी, कोकणा-जमी, खोबा, जांभळी-दोडके, सिंदीपार, सौंदड, बाम्हणी, खडकी, सावंगी, खोदायती, सडक-अर्जुनी, पांढरवाणी, केसलवाडा, पुतळी, कोयलारी, शेंडा, मसरामटोला, सहाकेपार, मुशानझुरवा, श्रीरामनगर बोपाबोडी, हेटी, गिरोला, कोदामेडी, तिडका, हलिमारेटोला, बकी, मेंडकी, कोसमघाट, सालईटोला या गावात पाणी टंचाई समस्या अधिक बिकट आहे. त्यामुळे या गावातील महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तालुक्याची लोकसंख्या १ लाख १५ हजार ५९४ असून लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठ्याचीे साधने अपुरी असल्याने दरवर्षी तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.ही बाब प्रशासनाला सुध्दा चांगली माहिती आहे. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिल्याने या समस्येत अजून वाढ झाल्याचे चित्र आहे. उमरझरी मध्यम प्रकल्प व दोडके-जांभळी या प्रकल्पातून २० किमी अंतरावर पाणी आणण्याची योजना तयार करण्यात आली. मात्र प्रकल्पातच अल्प पाणीसाठा असल्यामुळे या प्रकल्पातून पाणी पुरवठा कसा होईल व शहरवासीयांची तहान कशी भागेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. उमरझरी मध्यम प्रकल्पाचे पाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आणले जात आहे. मात्र ठिकठिकाणी पाईप लाईन लिकेज असल्यामुळे शहरापर्यंत पाणी पोहचेपर्यंत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंदतालुक्यातील १६ गावे व २० वाड्यांना पाणी पुरवठा करणारी प्रादेशिक पाणी योजना बंद पडली आहे. तर बाम्हणी-खडकी येथील पाणी पुरवठा योजनेची तिच स्थिती आहे. सालईटोला येथील पाणी पुरवठा योजना पुतळीच्या माध्यमातून सडक-अर्जुनी शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. दोन प्रादेशिक पाणी पुरवठा बंद असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत अधिक भर पडली आहे.गढूळ पाण्याचा पुरवठाउन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीची स्वच्छता व गाळाचा उपसा करण्याची गरज होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सडक-अर्जुनी शहरवासीयांना गढूळ व माती मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. गढूळ पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या भागात सर्वाधिक पाणी टंचाईसडक-अर्जुनी शहरातील शिक्षक कॉलनी, कस्तुरीदेवी नगर, प्रगती कॉलनी, लहरी नगरी, पंचायत समिती कॉलनी, कुंभार मोहल्ला, हनुमान मंदिर, पेट्रोल पंपसमोरील कॉलनीत मागील काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई आहे. या भागात १५ ते २० बोअरवेल तसेच विहिरी आहेत. मात्र त्यांना पाच ते दहा मिनिटेच पाणी येत असल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. पाणी टंचाईची समस्या ओळखून उमरझरी मध्यम प्रकल्पाचे पाणी सडक-अर्जुनी जवळून वाहणाºया नदीत सोडण्यात यावे. पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. तसेच जनावरांना सुध्दा पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.८० टक्के विहिरी पडल्या कोरड्यातालुक्यात विंधन विहीरी १०२० आहेत. लघू नळ पाणी पुरवठा योजना ५३ आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा योजना ३४ आहेत. सार्वजनिक विहिरी ४३२ तर खासगी विहिरी १६२० आहेत. यापैकी सार्वजनिक व खाजगी विहिरीच्या ८० टक्के विहीरी कोरड्या पडल्या असल्याची माहिती पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी गजभिये यांनी सांगितले. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई