शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहा तासात पोहचू शकेल डांर्गोर्लीत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:15 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर परिणाम झाला. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्यांव्दारे आणण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकालवे झाले ओके : पाणीटंचाईचे संकट होणार दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर परिणाम झाला. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्यांव्दारे आणण्यात येणार आहे. कालव्यांचे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मागील दोन वर्षांपासून डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडत असल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यंदा एप्रिल महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी खालावली आहे. परिणामी सहा दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने शहराला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तर शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. मागील वर्षी सुध्दा पुजारीटोला धरणाचे पाणी आणून पाणीटंचाईवर मात करण्यात आली होती. मात्र मागील वर्षी कालव्यांची दुरूस्ती झाली नसल्याने काही ठिकाणी कालवे फुटले होते. परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला होता. ही समस्या ओळखून आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन पुजारीटोला ते डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या कालव्यांची दुरूस्ती करण्यासाठी निधी मंजूर करुन घेतला. त्यानंतर १५ नोव्हेबर ते मार्चपर्यंत कालव्यांच्या दुरूस्तीचे काम करण्यात आले. शिवाय कालव्यांच्या दुरूस्तीसह नवीन गेट तयार करण्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.त्यामुळेच कालवे पूर्णपणे व्यवस्थित झाले असून पुजारीटोला ते डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत केवळ सहा तासात पाणी पोहचविणे शक्य होणार आहे. यामुळे शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य होणार असून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ सुध्दा शहरवासीयांवर येणार नसल्याचे बोलल्या जाते.शेतकऱ्यांना होणार मदतपुजारीटोला ते गोंदियापर्यंत कालव्यांची दुरूस्ती मागील ४० वर्षांपासून करण्यात आली नव्हती. मात्र आ.गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने कालव्याच्या दुरूस्तीसाठी शासनाने निधी मंजूर केला.त्यामुळे ९० कि.मी.च्या कालव्याची दुरूस्ती झाली असून शेतकऱ्यांना सुध्दा सिंचनासाठी याची मदत होणार आहे. शिवाय यामुळे पाण्याचा होणार अपव्यय टाळणे शक्य होणार आहे.मजीप्रा उपाय योजनापासून अनभिज्ञगोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र शहरात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली असून यावर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी पाच सहा दिवसात आणण्यात येईल, अशी माहिती या विभागाचे अधिकारी देत आहे. मात्र कालव्यांच्या दुरूस्तीमुळे केवळ सहा तासात पुजारीटोला ते डांगोर्लीपर्यंत पोहचणार आहे. पण यापासून या विभागाचे अधिकार अनभिज्ञ असून पाणी पोहचण्यास चार पाच दिवस लागतील असे सांगत आहे.मागील ४० वर्षांत जे कालवे दुरूस्तीचे काम झाले नव्हते ते आपण शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे मार्गी लागले आहे. पुजारीटोला ते गोंदियापर्यंतच्या कालव्यांची दुरूस्ती झाल्याने कालव्याव्दारे पुजारीटोला ते डांगोर्लीपर्यंत केवळ सहा तासात पाणी आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.कालव्यांची दुरूस्ती झाल्याने देवरी, आमगाव आणि गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांना सुध्दा याचा फायदा होणार आहे.-गोपालदास अग्रवाल, आमदार.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल