शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
3
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
4
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
5
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
6
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
7
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
8
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
9
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
10
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
11
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
12
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
13
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
14
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
16
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
17
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
18
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
19
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
20
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
Daily Top 2Weekly Top 5

सहा तासात पोहचू शकेल डांर्गोर्लीत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:15 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर परिणाम झाला. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्यांव्दारे आणण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकालवे झाले ओके : पाणीटंचाईचे संकट होणार दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर परिणाम झाला. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्यांव्दारे आणण्यात येणार आहे. कालव्यांचे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मागील दोन वर्षांपासून डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडत असल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यंदा एप्रिल महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी खालावली आहे. परिणामी सहा दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने शहराला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तर शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. मागील वर्षी सुध्दा पुजारीटोला धरणाचे पाणी आणून पाणीटंचाईवर मात करण्यात आली होती. मात्र मागील वर्षी कालव्यांची दुरूस्ती झाली नसल्याने काही ठिकाणी कालवे फुटले होते. परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला होता. ही समस्या ओळखून आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन पुजारीटोला ते डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या कालव्यांची दुरूस्ती करण्यासाठी निधी मंजूर करुन घेतला. त्यानंतर १५ नोव्हेबर ते मार्चपर्यंत कालव्यांच्या दुरूस्तीचे काम करण्यात आले. शिवाय कालव्यांच्या दुरूस्तीसह नवीन गेट तयार करण्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.त्यामुळेच कालवे पूर्णपणे व्यवस्थित झाले असून पुजारीटोला ते डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत केवळ सहा तासात पाणी पोहचविणे शक्य होणार आहे. यामुळे शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य होणार असून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ सुध्दा शहरवासीयांवर येणार नसल्याचे बोलल्या जाते.शेतकऱ्यांना होणार मदतपुजारीटोला ते गोंदियापर्यंत कालव्यांची दुरूस्ती मागील ४० वर्षांपासून करण्यात आली नव्हती. मात्र आ.गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने कालव्याच्या दुरूस्तीसाठी शासनाने निधी मंजूर केला.त्यामुळे ९० कि.मी.च्या कालव्याची दुरूस्ती झाली असून शेतकऱ्यांना सुध्दा सिंचनासाठी याची मदत होणार आहे. शिवाय यामुळे पाण्याचा होणार अपव्यय टाळणे शक्य होणार आहे.मजीप्रा उपाय योजनापासून अनभिज्ञगोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र शहरात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली असून यावर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी पाच सहा दिवसात आणण्यात येईल, अशी माहिती या विभागाचे अधिकारी देत आहे. मात्र कालव्यांच्या दुरूस्तीमुळे केवळ सहा तासात पुजारीटोला ते डांगोर्लीपर्यंत पोहचणार आहे. पण यापासून या विभागाचे अधिकार अनभिज्ञ असून पाणी पोहचण्यास चार पाच दिवस लागतील असे सांगत आहे.मागील ४० वर्षांत जे कालवे दुरूस्तीचे काम झाले नव्हते ते आपण शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे मार्गी लागले आहे. पुजारीटोला ते गोंदियापर्यंतच्या कालव्यांची दुरूस्ती झाल्याने कालव्याव्दारे पुजारीटोला ते डांगोर्लीपर्यंत केवळ सहा तासात पाणी आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.कालव्यांची दुरूस्ती झाल्याने देवरी, आमगाव आणि गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांना सुध्दा याचा फायदा होणार आहे.-गोपालदास अग्रवाल, आमदार.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल