शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नळाला आज पाणी आले, उद्याचा मात्र भरवसा नाही...

By कपिल केकत | Updated: July 29, 2023 18:52 IST

- लो-व्होल्टेजमुळे समस्या : त्यात यंत्रांमध्ये बिघाडाची भर

कपिल केकत, गोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला एक ना एक ग्रहण लागत असल्याचे दिसत आहे. एकीकडे लो-व्होल्टेजमुळे डोंगरली पंप हाऊसमधील पंप सुरू होत नसल्याने पाणी पुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. तर त्यातच वारंवार यंत्रांमध्ये येणाऱ्या बिघाडाची त्यात भर पडत आहे. परिणामी वारंवार पाणी पुरवठा खंडित होत असून, ‘नळ आज आले, उद्याचा मात्र भरवसा नाही’ असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.

शहरासह लगतच्या ग्राम कटंगी व कुडवाला येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी डांगोरली येथे मजिप्राचे पंप हाऊस असून, वैनगंगेचे पाणी खेचून ते शहरासह दोन्ही गावांना दिले जाते. यासाठी पंप हाऊसमध्ये २४० एचपी क्षमतेचे दोन मोटारपंप लावण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून डांगोरलीला कमी वीज दाबाने पुरवठा केला जात असल्यामुळे दोन्ही पंप सुरू होत नाहीत. परिणामी मजिप्राच्या पाण्याच्या ७ टाक्या भरत नाहीत व दोनवेळचा नियमित पाणी पुरवठा करता येत नाही.

त्यातच मागील पंधरवड्यापासून मजिप्राचे ग्रह काही व्यवस्थित नसल्याने त्यांच्या यंत्रांमध्ये वारंवार बिघाड होत आहे. १८ तारखेला वीज वाहिन्या तुटल्याने पाणी पुरवठा करता आला नाही. २१ तारखेला पंपाच्या स्टार्टरला शॉटसर्किटने आग लागल्याने तर २६ तारखेला नवीन स्टार्टर नादुरुस्त झाल्याने शहराला पाणी पुरवठा करता आला नाही. दर एक-दोन दिवसांमध्ये पाणी पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मात्र पाण्याअभावी गैरसोय होत आहे. परिणामी त्यांच्यात रोष वाढत असून, ते कधीही रस्त्यावर उतरतील, याचा नेम नाही.

भीमनगर, रामनगर व सिव्हिल लाइन्स परिसराला फटका

- कमी वीज दाबामुळे डांगोरली पंप हाऊसमधील एकच पंप सुरू राहतो. परिणामी सात टाक्या भरता येत नाहीत. त्यातही रामनगर, भीमनगर व सिव्हिल लाइन्स परिसरात पाणी पुरवठा होत नाही. आता हा नेहमीचाच प्रकार झाला असून, या तिन्ही भागातील नागरिक चांगलेच संतापले आहेत. एक दिवस नळ येतो व दोन-तीन दिवस बंद राहतो. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. अशात महावितरणने या समस्येवर तोडगा काढावा, जेणेकरून या तिन्ही भागांना सुरळीत पाणी पुरवठा करता यावा, अशी मागणी रामनगर, भीमनगर व सिव्हिल लाइन्सवासीयांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी