शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

भुयारी बोगद्यात पुन्हा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:08 IST

हलबीटोला रेल्वे भुयारी बोगद्याची पाणी समस्या अद्यापही मार्गी लागलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात या भुयारी बोगद्यात पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत आहे. तीन किमीचा फेरामारुन हलबीटोलावासीयांना गोरेगावला यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : हलबीटोला रेल्वे भुयारी बोगद्याची पाणी समस्या अद्यापही मार्गी लागलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात या भुयारी बोगद्यात पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत आहे. तीन किमीचा फेरामारुन हलबीटोलावासीयांना गोरेगावला यावे लागत आहे. ही समस्या लवकारात लवकर मार्गी न लावल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.सन २०१० ला हलबीटोला रेल्वे भुयारी बोगद्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून पावसाळ्यात ह्या बोगद्यात नेहमी पाणी साचून राहते. ही समस्या मार्गी लावण्यात यावी, यासाठी वांरवार रेल्वे विभागाला निवेदन देण्यात आले. यानंतर रेल्वे विभागाने नाली आणि रस्त्याचे बांधकाम सुरू केले होते. पण त्यानंतर हे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले. ते काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही.त्यामुळे पाणी साचण्याची समस्या कायम आहे. पावसाळ्यात रस्त्याची स्थिती फारच दयनीय होते. रेल्वे भुयारी बोगद्यात सध्या स्थितीत पाच फुट पाणी साचून आहे. त्यामुळे हलबीटोला येथील नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.रेल्वे विभागाने याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी माजी उपसरपंच राहुल कटरे, अफरोज कुरैशी, दिलीप पटले, रमेश पटले, डिलेश्वर पटले, राजकुमार रंगारी, नंदलाल पटले, रामचंद लटये, सुखदेव चुलपार, संतोष कृपाल, महेंद्र कृपाल, दिलीप बोपचे, योगेश पेटले, ग्यानीराम लटये, वामनराव लटये यांनी केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे