शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

केशोरीच्या पोलिसांना निवासस्थानांची प्रतीक्षा

By admin | Updated: November 4, 2014 22:43 IST

महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करुन पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढविली आहे. याचा प्रत्यय केशोरी येथे अल्पावधीतच

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करुन पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढविली आहे. याचा प्रत्यय केशोरी येथे अल्पावधीतच एक भव्य सुसज्ज दुमजली पोलीस ठाण्याची निर्माण झालेली वास्तु बघून येते. मात्र शासन अजूनही पोलीस कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्षच करीत असल्याचे चित्र केशोरी येथे दिसून येत आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे सन २००० पासून नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती लहानशा इमारतीत करण्यात आली होती. मात्र आज सर्वसुविधायुक्त भव्य व सुसज्ज पोलीस ठाण्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उभी आहे. मात्र त्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी गावात भाड्याच्या घरी राहून अपुऱ्या सुविधा असताना नोकरी करीत आहेत. डोक्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी २४ तास ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था उत्तम असणे गरजेचे असणे अपेक्षित असते. तशी व्यवस्था पोलीस ठाणे परिसरात असणे गरजेचे असते. त्यासाठी शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थाने तयार करून देणे अपेक्षित आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना गावात पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध होत नसतानादेखील त्या ठिकाणी राहून जनतेच्या सरंक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. केशोरीच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शासनाने राहण्याची सोय केली नाही. त्यामुळे तेथील पोलीस आजही निवासस्थानांच्या प्रतीक्षेत आहेत.या पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यथेचा शासनाचे गांभीर्याने विचार करून केशोरी पोलीस ठाणे परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पक्की निवासस्थाने बांधण्यासाठी पाऊले उचलावीत. पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करून त्यांच्या मनातील व्यथा दूर करावी, अशी मागणी येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)