शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:17 IST

मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते.

ठळक मुद्देसंडे अँकर । १५ गावातील शेतकऱ्यांना होणार मदत । दोन्ही हंगामातील पिकांना मिळू शकेल पाणी

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते.परंतु प्रकल्पाचे काम अर्धवट पडून असल्याने मागील अनेक वर्षापासून या परिसरातील शेती वरथेंबी पावसावरच अवलंबून असून सिंचनाच्या सोयीची प्रतीक्षा करीत आहे.बेवारटोला धरणाचा जलाशय साठा ७.९६८८ दशलक्ष घनमिटर आहे. मृत साठा ०.७२४८ दशलक्ष घनमिटर आहे. या धरणाची लांबी ९८० मिटर आहे. धरणाची महत्तम उंची १९.३० मिटर एवढी राहणार आहे. या धरणामध्ये एकूण पाण्याचा येवा १६.२२१ दशलक्ष घनमिटर पेक्षा जास्त असून धरणाच्या क्षमतेपेक्षा दुप्पटच्यावर राहणार आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता १७४२ हेक्टर असून या धरणातील दोन्ही कालव्यातून १३७९ हेक्टर शेतीला थेट लाभ मिळेल. तसेच या प्रकल्पांतर्गत २३१५ हेक्टर क्षेत्राचा लाभ क्षेत्रामध्ये समावेश असेल. बेवारटोला प्रकल्पासाठी ४९.६०२ हेक्टर वनजमिन आणि १४४.६४ हेक्टर खासगी जमिन अधिगृहीत करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या या धरणामध्ये छत्तीसगड राज्यातील नदी नाल्यांचा पाणी आणि या भागात मोठमोठे पर्वत रांग असल्याने त्यावरुन पडणारे पाणी सुद्धा वर्षभर संग्रहीत होते. त्यामुळे या धरणाच्या पाण्यामुळे शेतीला भरपूर सिंचन सोय होऊ शकतो. ऐवढेच नाही तर खरीप आणि रबी हंगामालाही भरपूर पाणी मिळू शकतो. एखाद्या वर्षी पर्जन्यमान कमी असला तरी या धरणात पाण्याचा साठा कमी पडणार नाही. दरवर्षी उन्हाळी धानपिकासह रबी हंगामातील इतर पिके सुद्धा घेतल्यास पाण्याची कमी भासणार नाही.या भागाची शेती सुद्धा ऐवढी सुपीक आहे की या जमिनीला सिंचनाची सोय झाल्यास कोणतीही पीक घेता येऊ शकते. अशात या भागाचा शेतकरी नफ्याची शेती करण्यासाठी नगदी पिके घेऊ शकतात. या भागात गरीब आदिवासी शेतकरी मोठ्या आशेवर आहेत.पुढाकार घेण्याची गरजबेवारटोला प्रकल्प आणि त्याचे कालवे अपूर्ण असून मागील दोन दशकापासून या क्षेत्रातील शेतकरी प्रकल्प पूर्ण होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. याचा मुख्य कारण म्हणजे या भागातील शेतकºयांच्या नेतृत्व करीत पुढाकार घेणाºया कणखर व्यक्तीची नेहमी कमतरता राहीली. काही स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या प्रकल्पाची समस्या उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना आपला प्रस्ताव यशस्वीपणे मांडता आला नाही. बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास दरेकसा परिसरातील मुख्य आठ गावासह जवळपास १५ गावातील ५०० ते ६०० शेतकरी समृद्ध शेती करेतील. यात टोयागोंदी, चांदसूरज, विचारपूर, ठूबरुटोला, कोपालगड, दल्लीटोला, जमाकुडो, पठाणटोला, तेलीटोला, बंजारी, डहाराटोला, भर्रीटोला, धनेगाव, दलदलकुही व इतर छोट्या गावांना लाभ मिळू शकतो.बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आदिवासी गरीब शेतकऱ्यांच्या शेतात पाणी मिळून या भागातील शेतकरी व शेतमजूर प्रगतीच्या वाटेवर येऊ शकतात. शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे.- शंकरलाल मडावीआदिवासी सेवक दरेकसा

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प