शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:17 IST

मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते.

ठळक मुद्देसंडे अँकर । १५ गावातील शेतकऱ्यांना होणार मदत । दोन्ही हंगामातील पिकांना मिळू शकेल पाणी

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते.परंतु प्रकल्पाचे काम अर्धवट पडून असल्याने मागील अनेक वर्षापासून या परिसरातील शेती वरथेंबी पावसावरच अवलंबून असून सिंचनाच्या सोयीची प्रतीक्षा करीत आहे.बेवारटोला धरणाचा जलाशय साठा ७.९६८८ दशलक्ष घनमिटर आहे. मृत साठा ०.७२४८ दशलक्ष घनमिटर आहे. या धरणाची लांबी ९८० मिटर आहे. धरणाची महत्तम उंची १९.३० मिटर एवढी राहणार आहे. या धरणामध्ये एकूण पाण्याचा येवा १६.२२१ दशलक्ष घनमिटर पेक्षा जास्त असून धरणाच्या क्षमतेपेक्षा दुप्पटच्यावर राहणार आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता १७४२ हेक्टर असून या धरणातील दोन्ही कालव्यातून १३७९ हेक्टर शेतीला थेट लाभ मिळेल. तसेच या प्रकल्पांतर्गत २३१५ हेक्टर क्षेत्राचा लाभ क्षेत्रामध्ये समावेश असेल. बेवारटोला प्रकल्पासाठी ४९.६०२ हेक्टर वनजमिन आणि १४४.६४ हेक्टर खासगी जमिन अधिगृहीत करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या या धरणामध्ये छत्तीसगड राज्यातील नदी नाल्यांचा पाणी आणि या भागात मोठमोठे पर्वत रांग असल्याने त्यावरुन पडणारे पाणी सुद्धा वर्षभर संग्रहीत होते. त्यामुळे या धरणाच्या पाण्यामुळे शेतीला भरपूर सिंचन सोय होऊ शकतो. ऐवढेच नाही तर खरीप आणि रबी हंगामालाही भरपूर पाणी मिळू शकतो. एखाद्या वर्षी पर्जन्यमान कमी असला तरी या धरणात पाण्याचा साठा कमी पडणार नाही. दरवर्षी उन्हाळी धानपिकासह रबी हंगामातील इतर पिके सुद्धा घेतल्यास पाण्याची कमी भासणार नाही.या भागाची शेती सुद्धा ऐवढी सुपीक आहे की या जमिनीला सिंचनाची सोय झाल्यास कोणतीही पीक घेता येऊ शकते. अशात या भागाचा शेतकरी नफ्याची शेती करण्यासाठी नगदी पिके घेऊ शकतात. या भागात गरीब आदिवासी शेतकरी मोठ्या आशेवर आहेत.पुढाकार घेण्याची गरजबेवारटोला प्रकल्प आणि त्याचे कालवे अपूर्ण असून मागील दोन दशकापासून या क्षेत्रातील शेतकरी प्रकल्प पूर्ण होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. याचा मुख्य कारण म्हणजे या भागातील शेतकºयांच्या नेतृत्व करीत पुढाकार घेणाºया कणखर व्यक्तीची नेहमी कमतरता राहीली. काही स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या प्रकल्पाची समस्या उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना आपला प्रस्ताव यशस्वीपणे मांडता आला नाही. बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास दरेकसा परिसरातील मुख्य आठ गावासह जवळपास १५ गावातील ५०० ते ६०० शेतकरी समृद्ध शेती करेतील. यात टोयागोंदी, चांदसूरज, विचारपूर, ठूबरुटोला, कोपालगड, दल्लीटोला, जमाकुडो, पठाणटोला, तेलीटोला, बंजारी, डहाराटोला, भर्रीटोला, धनेगाव, दलदलकुही व इतर छोट्या गावांना लाभ मिळू शकतो.बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आदिवासी गरीब शेतकऱ्यांच्या शेतात पाणी मिळून या भागातील शेतकरी व शेतमजूर प्रगतीच्या वाटेवर येऊ शकतात. शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे.- शंकरलाल मडावीआदिवासी सेवक दरेकसा

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प