शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

डॉक्टरांच्या प्रतीक्षेत रूग्ण ताटकळत

By admin | Updated: March 27, 2015 00:36 IST

ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने शासनाने रावणवाडी येथे कोट्यवधी रूपयांच्या खर्चातून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली.

रावणवाडी : ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने शासनाने रावणवाडी येथे कोट्यवधी रूपयांच्या खर्चातून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. मात्र या आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध तर होतच नाही. शिवाय रुग्णांना सतत डॉक्टरांचीच प्रतीक्षा करीत जिवंतपणीच मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.सामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्नशील असते. परंतु जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव नसणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामान्य जनतेच्या आरोग्याशी काहीच देणे घेणे नाही. पूर्वीच आरोग्य केंद्रातील पदे रिक्त असल्याने त्यांचा दैनंदिन काम काजावर विपरित परिणाम होत आहे. दोन मंजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. शिल्पा शहारे ह्या वरिष्ठांच्या विना परवाणगीने मागील दहा-बारा दिवसांपासून स्वत:च्या मर्जीने रजेवर गेल्याचे आढळून आले आहे. सदर वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी न राहता स्वत:च्या सोयीनुसार नागपूरवरुन अपडाऊन करतात. अशात रुग्णांनी उपचारासाठी कुणाकडे जावे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. आरोग्य केंद्राच्या आवारातच अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सुसज्ज अशी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. परंतु बहुतांश निवासस्थाने रिकामेच पडून आहेत. वैद्यकीय अधिकारीच अपडाऊन करीत असल्यामुळे कर्मचारीही स्वयंमर्जीनुसार अपडाऊन करतात. अशा कार्यपद्धतीमुळे रुग्णांना हवा असलेले उपचार मिळणे कसे शक्य होणार? याची जाणिवसुद्धा वरिष्ठांना नाही.सध्या संपूर्ण राज्यात स्वाईन फ्ल्यू आजाराची धास्ती पसरली आहे. या आजारांनी मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक आठवड्यात हवामानात बदल होत आहे. उन्हाळा सुरु झाला असला तरी अवकाळी पावसाच्या कहराने हवामानातही फपाट्याने परिवर्तन होत आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होणे स्वाभाविक आहे. मात्र आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने आरोग्य केंद्र निराधार झाले आहे. वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्याची जान नसल्यासारखे कृत्य करीत असल्याने याचा फटका सरळ सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. काही कर्मचारी कागद काळे करण्यातच मस्त आहेत. अशात सामान्य नागरिकांनी उपचार करावे तरी कुठे? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. या प्रकाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)