शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

केशोरी तालुक्याला निर्मितीची प्रतीक्षा

By admin | Updated: September 12, 2015 01:41 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हा भाग नक्षलग्रस्त व दुर्लक्षित भाग असून राज्यभरात मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हा भाग नक्षलग्रस्त व दुर्लक्षित भाग असून राज्यभरात मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकीय नेतृत्वाची गरज आहे. राजकीय नेतृत्वाअभावी हा परिसर विकासापासून कोसोदूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या भागात पाणी सिंचन व्यवस्था पुरेशी नाही. औद्योगिक विकास नाही. यामुळे तरुण सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम नाही. आता साकोली जिल्ह्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्याबरोबरच केशोरी तालुक्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे. १६ वर्षापुर्वी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा केशोरीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देऊन ४४ गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावेळेस शासनाने केशोरी तालुका निर्मितीची दखल घेतली नाही. सध्या शासनदरबारी साकोली जिल्हा निर्मिती संबंधी चर्चेला उत आले आहे. त्याचबरोबर येथील राजकीय पुढाऱ्यांनी साकोली जिल्हा निर्मितीची मागणी केली आहे. जर साकोली जिल्हा निर्मितीची घोषणा झाल्यास केशोरीला नवीन तालुका निर्माण करुन साकोली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात यावे अशी या परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. निवडणूक प्रसंगी बड्या पुढाऱ्यांनी केशोरी तालुका निर्मितीचे आश्वासन दिले होते. परंतु दिलेले आश्वासन हवेतच विरले. तालुका निर्मितीचे गाजर देऊन मतांचा जोगवा मागण्या व्यतिरिक्त पुढारी काहीच करीत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या सीमेचा विचार करुन नवीन विधानसभा क्षेत्र निर्माण करण्यात आले. अर्जुनी-मोरगाव तालुका विस्ताराने जिल्ह्यात सर्वात मोठा आहे. या तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे अंतर ५० किमी. पर्यंत आहे. केशोरी परिसरातून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)