शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

पाच महिने लोटूनही बोनससाठी प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ महिने लोटूनही बोनस मिळालेला नाही. त्यात आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांची हाती पैसा नसल्याने त्यांची चिंता वाढली असून बोनस खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी सापडला अडचणीत : शेतकऱ्यांची खरीप हंगामात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : खरीप हंगामात आधारभूत किंमतीत विकलेल्या धानावर शासनाने बोनस जाहीर केला होता. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ महिने लोटूनही बोनस मिळालेला नाही. त्यात आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांची हाती पैसा नसल्याने त्यांची चिंता वाढली असून बोनस खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्था, सेवा सहकारी संस्था व तालुका भात खरेदी विक्री संस्थांमार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरून खरीप हंगामातील धान खरेदी केली जाते. ५० क्विंटल पर्यंत धानाला ५०० रुपये बोनस व वाढीव २०० रु पये ७०० रु पये प्रतिक्विंटल मागे देण्यात येणार होते. ऑक्टोंबर महिन्यापासून आता ५ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही धानाच्या विक्रीवरील बोनस शेतकºयांच्या खात्यात आला नाही. विशेष म्हणजे, आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना पुन्हा खरीपाची तयारी करावयाची आहे. हाती पैसा नसल्याने शेतकऱ्या बोनसचा आधार होता. मात्र हंगाम तोंडावर असूनही खरीप हंगाम २०१९-२० मध्ये विकलेल्या धानाचा बोनस मिळाला नसल्याने शेतकऱ्यांसमोर सन २०२०-२१ मधील खरीप हंगामाचे आव्हान उभे आहे.या हंगामासाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून शेतीपूरक किंवा पर्यायी कुठलेही कामधंदे शेतकऱ्यांना नाही. त्यात रोजगार हमीची कामे नाही. अशा रोजगारांतून मिळणाऱ्या पैशांच्या भरवशावर खरीप हंगामाची तयारी शेतकरी करीत होते. साधारणत: शेतकरी १५ मे पासून खरीपाच्या तयारीला लागतो. परंतु ‘लॉकडाऊन’च्या काळात बी-बियाणे खरेदीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. बियाणे महामंडळाचे धानाचे बियाणे पंचायत समिती मार्फत अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जाते. मागील वर्षी हे बियाणे बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळालेच नाही. अर्जुनी-मोरगाव येथील कृषी केंद्रात सातबारा गोळा करून पंचायत समितीतून अनुदानावर मिळणारे बियाणे मोजक्या कृषी केंद्रात उपलब्ध होतात कसे? मग ही बियाणे शेतकºयांना जादा भावाने विकली जातात. अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी मागील वर्षी होत्या.तर काही कृषी केंद्रातून विकले जाणारे बियाणे खरीप व आता रब्बी हंगामात निकृष्ट दर्जाचे निघाल्याचे निदर्शनास आले आहे. कधी अवकाळी पावसाचा फटका तर कधी निकृष्ट बियाणे यामुळे शेतकरी धान पिकाच्या भरघोस उत्पन्नापासून वंचित राहतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला शेतकरी बळी पडतो. यंदा अनुदानावर पंचायत समितीतून मिळणारी बियाणे तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी सहायक व पर्यवेक्षक यांच्यामार्फत दिले जावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी