शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पाच महिने लोटूनही बोनससाठी प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ महिने लोटूनही बोनस मिळालेला नाही. त्यात आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांची हाती पैसा नसल्याने त्यांची चिंता वाढली असून बोनस खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी सापडला अडचणीत : शेतकऱ्यांची खरीप हंगामात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : खरीप हंगामात आधारभूत किंमतीत विकलेल्या धानावर शासनाने बोनस जाहीर केला होता. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ महिने लोटूनही बोनस मिळालेला नाही. त्यात आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांची हाती पैसा नसल्याने त्यांची चिंता वाढली असून बोनस खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्था, सेवा सहकारी संस्था व तालुका भात खरेदी विक्री संस्थांमार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरून खरीप हंगामातील धान खरेदी केली जाते. ५० क्विंटल पर्यंत धानाला ५०० रुपये बोनस व वाढीव २०० रु पये ७०० रु पये प्रतिक्विंटल मागे देण्यात येणार होते. ऑक्टोंबर महिन्यापासून आता ५ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही धानाच्या विक्रीवरील बोनस शेतकºयांच्या खात्यात आला नाही. विशेष म्हणजे, आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना पुन्हा खरीपाची तयारी करावयाची आहे. हाती पैसा नसल्याने शेतकऱ्या बोनसचा आधार होता. मात्र हंगाम तोंडावर असूनही खरीप हंगाम २०१९-२० मध्ये विकलेल्या धानाचा बोनस मिळाला नसल्याने शेतकऱ्यांसमोर सन २०२०-२१ मधील खरीप हंगामाचे आव्हान उभे आहे.या हंगामासाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून शेतीपूरक किंवा पर्यायी कुठलेही कामधंदे शेतकऱ्यांना नाही. त्यात रोजगार हमीची कामे नाही. अशा रोजगारांतून मिळणाऱ्या पैशांच्या भरवशावर खरीप हंगामाची तयारी शेतकरी करीत होते. साधारणत: शेतकरी १५ मे पासून खरीपाच्या तयारीला लागतो. परंतु ‘लॉकडाऊन’च्या काळात बी-बियाणे खरेदीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. बियाणे महामंडळाचे धानाचे बियाणे पंचायत समिती मार्फत अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जाते. मागील वर्षी हे बियाणे बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळालेच नाही. अर्जुनी-मोरगाव येथील कृषी केंद्रात सातबारा गोळा करून पंचायत समितीतून अनुदानावर मिळणारे बियाणे मोजक्या कृषी केंद्रात उपलब्ध होतात कसे? मग ही बियाणे शेतकºयांना जादा भावाने विकली जातात. अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी मागील वर्षी होत्या.तर काही कृषी केंद्रातून विकले जाणारे बियाणे खरीप व आता रब्बी हंगामात निकृष्ट दर्जाचे निघाल्याचे निदर्शनास आले आहे. कधी अवकाळी पावसाचा फटका तर कधी निकृष्ट बियाणे यामुळे शेतकरी धान पिकाच्या भरघोस उत्पन्नापासून वंचित राहतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला शेतकरी बळी पडतो. यंदा अनुदानावर पंचायत समितीतून मिळणारी बियाणे तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी सहायक व पर्यवेक्षक यांच्यामार्फत दिले जावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी