शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वडाचं रोप लावून साजरी करा ‘वटपौर्णिमा’

By admin | Updated: June 2, 2015 01:32 IST

मराठीतील ज्येष्ठ महिन्यात, अर्थात पावसाळ्याच्या तोंडावर येणारा ‘वटपौर्णिमा’ हा महिलांचा सण नावाप्रमाणेच

गोंदिया : मराठीतील ज्येष्ठ महिन्यात, अर्थात पावसाळ्याच्या तोंडावर येणारा ‘वटपौर्णिमा’ हा महिलांचा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडित आहे. या सणाला केवळ पारंपरिक दृष्टीकोणातून पाहिले जात असले तरी महिला या दिवशी ज्या वडाची पुजा करतात त्या वडाचे शास्त्रीय महत्वही खूप आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना, वडाचे पूजन आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.वडाचे झाडे हे दीर्घकाळ टीकणारे असून, त्याला विपूल पर्णसंभार असतो. त्यामुळे वडाची झाडे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदुषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करतात. तसेच त्यांच्या घनदाट पालवीमुळे ही झाडे हवेतील तापमान कमी करुन शीतलता देतात. वडाच्या झाडाला वर्षभर पिकलेली फळे येत असल्यामुळे बऱ्याच प्राण्यांना व पक्ष्यांना अन्न मिळते. याची लालचुटुक फळे खायला अक्षरश: शेकडो पक्षी याच्यावर तुटून पडतात. तसेच बरेच प्राणी व पक्षी वडाच्या झाडाचा रात्रीच्या निवाऱ्यासाठी उपयोग करतात. अशा प्रकारे वटवृक्ष हा एक संपूर्ण परिसंस्थेचे उदाहरण आहे. खेड्यातले व्यापारी वडाच्या सावलीत आपली दुकाने थाटत, त्यावरुनच त्याला बनिया, बनियन ट्री असे नाव पडले असावे. वडाचे झाड हळूहळू वाढते. तथापि आजकालच्या गतीमान जगामध्ये बहुतेक जण लागवडीसाठी जलद वाढणाऱ्या व शोभिवंत वृक्ष प्रजातींची निवड करतात. त्यामुळे पुरातन काळात जतन करण्यात आलेल्या या वृक्षांची संख्या खूप कमी झाली आहे.पूर्वीच्या काळी स्त्रिया वडाच्या झाडाच्या ठिकाणी जाऊन वटपूजा करीत असत. तथापि आता वडाच्या झाडांची संख्या कमी झाल्याने वडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करण्याची अनिष्ठा पद्धत रुढ होत आहे. ही बाब वटपौर्णिमा साजरी करण्याच्या मूळ उद्देशाशी पूर्णत: विसंगत असून त्यामुळे उलट वडांच्या झाडांची बेसुमार छाटणी होत असते. या अनिष्ठ प्रथेला आळा घालण्यासाठी राज्यात राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत स्थापन केलेल्या इको क्लबमधील विद्यार्थ्यांमार्फत प्रयत्न करण्यात आले. निसर्गाकडून काही घेण्यापेक्षा निसर्गाला काही देऊन सण, उत्सव साजरे करण्यासाठी इको क्लबच्या विद्यार्थ्यांमार्फत प्रचार, प्रसार, प्रसिद्धी करण्यात आली. २०१४ साली सामाजिक वनीकरण विभागाने वडाची रोपे तयार केली होती. बऱ्याच ठिकाणी स्त्रियांच्या हस्ते रोपे लावण्यात आली आहेत. तसेच वृक्षारोपण २०१४ च्या पावसाळ्यात करण्यात आले असून या वर्षासाठीही रोपे तयार करण्याचे कार्य चालू आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ‘अक्षय वृक्षा’चे संवर्धन गरजेचे या वृक्षाला फुटणाऱ्या पारंब्या व त्याचे स्वतंत्र वृक्षात होणारे रुपांतर, त्याला मिळणारे दीर्घायुष्य या गुणधर्मामुळे याला ‘अक्षय वृक्ष’ म्हटले गेले आहे. आजकाल बऱ्याच विकासकामांसाठी पूर्वीच्या काळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आली आहे.  आपल्या पूर्वजांनी वडाच्या झाडाचे महत्व ओळखून आपल्या संस्कृतीमध्ये वट पौर्णिमेच्या निमित्ताने वटपूजा करण्याची प्रथा रुढ केली.  वडाच्या लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेतला आहे. रोपांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका कुडवा येथे उपलब्ध आहेत, असे लागवड अधिकारी युवराज कुंभलकर यांनी कळविले.