शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिवणी येथील गावकरी पितात दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:41 IST

नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचयतची आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठ्यासाठी नळाची पाईप लाईन चक्क नालीत असल्याने गावकऱ्यांना गढूळ आणि दूषीत पाणी प्यावे लागत आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात असून यावर वेळीच उपाय योजना केली नाही तर या गावात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देगावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, साथ रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता

निलकंठ भुते।लोकमत न्यूज नेटवर्कचिरचाळबांध : नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचयतची आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठ्यासाठी नळाची पाईप लाईन चक्क नालीत असल्याने गावकऱ्यांना गढूळ आणि दूषीत पाणी प्यावे लागत आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात असून यावर वेळीच उपाय योजना केली नाही तर या गावात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आमगाव तालुक्यातील शिवणी गावाला बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. ४७ गावांसाठी असलेल्या या पाणी पुरवठा योजनेतून लोकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून दिले जाते. परंतु शुध्द होऊन आलेले तेच पाणी शिवणी येथील गावकऱ्यांना गढूळ व दूषीत होऊन मिळते. ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रकार सुरू असल्याचे बोलल्या जाते. कधी-कधी ते पाणी गावकऱ्यांना मिळत देखील नाही.या गावात सुध्दा टिल्लू पंपाची समस्या असल्याने अनेक गावकऱ्यांना नळाचे पाणीच मिळत नाही. पिण्यापुरते तरी पाणी मिळावे यासाठी महिलांना नालीमधून गेलेल्या नळ कनेक्शनमधून पाणी भरावे लागत आहे.सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पावसाचे पाणी रस्त्याच्या ज्या नाल्यांमधून वाहून जाते त्या नाल्यांमधूनच पिण्याचे पाणी भरावे लागते.नालीतून पाणी काढतांना अनेकदा नालीतील पाणी त्या पाण्याच्या भांडामध्ये जाते, पाऊस सुरू असल्यास तर पाणी भरण्यासाठी फारच बिकट स्थिती असते. नालीतील घाण पाण्यामुळे शिवणी येथील गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यासंदर्भात अनेकदा ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी तक्रारी दिल्यात परंतु त्याची अद्यापही दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या प्रकारामुळे गावकऱ्यांना साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.टिल्लू पंपाद्वारे घेतात पाणीशिवणी या गावात १५९ नळ कनेक्शनधारक आहेत.त्यापैकी १९ नळ कनेक्शन धारकांनी नळाचे अधिक पाणी घेण्यासाठी नळाला टिल्लूपंप बसविले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे टिल्लू पंप नाही अश्या लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पैसे मोजूनही पिण्याच्ंो पाणी शिवणीवासीयांना मिळत नाही. ज्यांनी नळाला पंप लावले त्यांची माहितीही ग्रामपंचायतला आहे.परंतु त्यांच्यावर कसलीही कारवाही आत्तापर्यंत करण्यात आली नाही.मीटर झाले गायबगावकºयांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेणे आवश्यक आहे. नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतचा खटाटोप असतो. परंतु शुध्द पाण्याला गढूळ पाण्याच्या स्वरूपात नागरिकांना पुरवठा होत असल्याचा प्रकार शिवणी गावात पाहायला मिळत आहे. सर्व नळ कनेक्शन धारकांना पिण्याचे पाणी मिळावे. जो जेवढे पाणी वापरेल तेवढे त्याला बिल द्यावे लागेल म्हणून शिवणी येथे प्रत्येक नळाला मीटर बसविण्यात आले होते. परंतु नळांचे मीटर गायब झाले आहेत.प्रत्येक नागरिकाला शुध्द पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतने टिल्लू पंप लावणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी तक्रार देऊनही लोकांवर कारवाई करण्यात आली नाही.- ग्यानिराम हत्तीमारे,तंटामुक्त अध्यक्ष शिवणी.ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे पाण्यात जंतू झालेल्या पाण्याचा पुरवठा शिवणी येथील गावकºयांना करण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतला माहिती देऊनही कुठलीच उपाय योजना करण्यात आली नाही.-विलास गायधने,नागरिक शिवणी.

टॅग्स :water shortageपाणीकपात