शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गावची शाळा-आमची शाळा या प्रकल्पाचे परीक्षण कोण करणार?

By admin | Updated: July 5, 2014 23:41 IST

जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘गावची शाळा - आमची शाळा’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शिक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व गावात शैक्षणिक

नामदेव हटवार - जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘गावची शाळा - आमची शाळा’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शिक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी सहभागी सर्व घटकांचा सक्रीय सहभाग कसा घेता येईल हे प्रकल्पाच्या उद्दिष्टात नमूद करण्यात आले आहे.सत्र २०१२-१३-१४ या काळात उपक्रम राबविताना प्रभागस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समित्यांनी शाळांचे मूल्यमापन करुन प्रथम व द्वितीय क्रमांक ठरविले. त्यात काही शाळांची प्रगती ही समाधानकारक आढळली तर काही शाळांनी या उपक्रमात नाममात्र, औपचारिकता म्हणून भाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून जनप्रतिनिधींनी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यात त्यांना शाळेची वस्तुस्थिती काय आहे हे प्रत्यक्षात दिसून आले.हा उपक्रम दोन वर्षापासून सुरू असताना या दोन वर्षात या उपक्रमामुळे सकारात्मक काय बदल झाला याचे परिक्षण कोण करणार? कधी करणार? असा प्रश्न निर्माण होतो. जर या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत असेल तर ती सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांची वाढते काय? की फक्त पुरस्कार प्राप्त शाळेतीलच विद्यार्थ्यांची वाढते याचे परिक्षण होणे आवश्यक आहे. कोणतीही योजना राबविताना गुणात्मक बदल बघणे आवश्यक आहे. जर योजना राबविताना त्यात गुणात्मक व सकारात्मक बदल होत नसेल तर अशा उपक्रमाला बंद करणे योग्य असते.त्यामुळे वेळ, पैसा व श्रय याची बचत होते. तेव्हा ‘गावची शाळा-आमची शाळा’ या उपक्रमाचे परीक्षण होणे आवश्यक आहे. या परिक्षणातून काही त्रुट्या आढळल्या तर त्या कशा दूर करता येईल, कामचोर शिक्षकांना या प्रकल्पात कसे कामाला लावता येईल याचाही विचार करणे आवश्यक आहे.सालेकसा तालुक्यातील ११८ शाळांचे दोन वर्षात मूल्यमापन झाले. त्यात काही शाळांनी शिक्षक, पालकांच्या सहकार्याने उत्तम काम करून पुरस्कार मिळविले. परंतु काही शाळांची काहीच प्रगती झालेली नाही. या शाळांचा विकास कसा होणार याचा विचार कोण करणार असा प्रश्न निर्माण होतो. जर शिक्षकांच्या अपडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर त्या शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिेजे. काही ठिकाणी कठोरपणे नियमाची अंमल बजावणी केलीच पाहिजे. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यावर उपाययोजना कठोरपणे शिक्षण विभागाने केली पाहिजे. नाही तर तेथेही भाई भतिजावाद, जातीवाद, राजकीय संबंध आणण्यात येते. तेव्हा ‘गावची शाळा- आमची शाळा’ या उपक्रमाचे परीक्षण करणे आवश्यक आहे. या परीक्षणास तज्ज्ञ, विद्वान, शिक्षण क्षेत्राशी निगडित व्यक्तींचा समावेश असायला पाहिजे. तरच या उपक्रमाचे फलित दिसून येईल.