शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

२३ मार्चला ग्रा.पं.कर्मचारी करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:26 AM

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहे. ही बाब अधिकाऱ्यांच्या वारंवार लक्षात आणून ...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहे. ही बाब अधिकाऱ्यांच्या वारंवार लक्षात आणून दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे परिणामी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना चार निवेदने दिली. संघटनेच्या शिष्टमंडळाने मुकाअ यांच्याशी दोनदा चर्चा करुन मागण्याबाबत माहिती दिली. पण त्यांनी केवळ आश्वासन देऊन वेळ मारुन नेली. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यात सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे राज्य संघटक सचिव मिलिंद गणवीर,अध्यक्ष चत्रूधन लांजेवार,कार्याध्यक्ष सुखदेव शहारे, कोषाध्यक्ष महेंद्र भोयर, संघटन सचिव विष्णू हत्तीमारे, सचिव रविंद्र किटे, उपाध्यक्ष आशिष उरकुडे, सहसचिव खोजराम दरवडे, उपाध्यक्ष ईश्वरदास भंडारी, सहसचिव बुधराम बोपचे,विनोद शहारे, सुनील लिल्हारे,महेंद्र कटरे, मिथुन राहुलकर यांनी कळविले आहे.

......

या आहेत प्रमुख मागण्या

राज्य शासनाने १० ऑगस्ट २०२० ला या कर्मचाऱ्यांकरिता वाढीव नवीन किमान वेतन देण्याचे जाहीर केले आहे. या शासन निर्णय अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी. राज्याच्या ग्रामविकास विभागाने वर्ष २००५ मध्ये शासन निर्णय निर्गमित करुन किमान वेतन, भत्ता, भविष्य निर्वाह निधी इत्यादी सेवा शर्तीच्या अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुकाअ, बिडीओ व संबंधित अधिकाऱ्यांवर दिली आहे. पण त्यांनी अद्यापही याची अंमलबजावणी केली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये किमान वेतन, भत्ता, भ. नि. नि. बाबतीत तक्रारीचे निराकरण, नवीन किमान वेतनाची अंमलबजावणी व इतर विषयांवर त्वरित तक्रार निराकरण समितीची बैठक घेऊन करण्याची मागणी केली आहे.

.........