शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

विदर्भाचा लढा तीव्र करावा लागेल

By admin | Updated: September 20, 2016 00:56 IST

१९०५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी असून त्यासाठी लढा सुरू आहे. २८ सप्टेंबर १९५३ ला

राम नेवले : विदर्भ राज्य आंदोलन समितीची जाहीर सभा परसवाडा : १९०५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी असून त्यासाठी लढा सुरू आहे. २८ सप्टेंबर १९५३ ला विदर्भाला जनतेची सम्मती न घेता जबरन महाराष्ट्रात सामील केले. तेव्हापासून वैदर्भीय जनतेवर अन्याय सुरू आहे. यामुळे आता विदर्भाचा लढा तिव्र करावा लागणार असल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम येवले यांनी केले. जवळील ग्राम कवलेवाडा येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जाहीर सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना येवले यांनी, नागपूर करारानुसार २३ टक्के नोकरी विदर्भातील युवकांना द्यायची होती. फक्त आठ टक्के दिल्याने चार लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग विदर्भात तयार झाला व बेरोजगारी वाढली. भारनियमन विदर्भात, वीज तयार होते विदर्भात व ३४ टक्के गळतीही विदर्भात, ६३०० मेगावॉट वीज तयार होऊनही विदर्भाला फक्त २२०० मेगावॉट दिली जाते. विदर्भाला विजेची गरज नसतानाही १३२ वीज प्रकल्प आणून ८६ हजार ४०७ मेगावॉट वीज तयार करून दिल्ली व मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर करिता पुरवठा केला जाणार. यासाठी एक लाख एकर सुपीक जमीन प्रकल्पाला जाईल. ९० हजार एकर टॉवरलाईनमुळे शेतीचे उत्पादन घटणार व उष्णतामान वाढणार आहे. संपूर्ण विदर्भ कँसर, टिबी व ह्दयरोगाने ग्रस्त होणार. शेतीमालाला भाव मिलत नसल्याने कर्जापोटी ३६ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीज नाही, पाणी नाही, शेतीपर्यंत रस्ते नसल्याचे सांगीतले. अशात वेगळे झालो तर १०० टक्के नोकऱ्या विदर्भाच्याच तरूणांना मिळणार. गडकरी व फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले. जनतेने शिक्ला मारताच सत्तेत आल्यावर त्यांना भान राहिले नाही. यासाठी विदर्भातील जनतेने ३ व ४ आॅक्टोबर ला तिव्र आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार दिलीप बंसोड, आनंद वंजारी, जिल्हाध्यक्ष टी.बी.कटरे, अर्चना नंदघळे, अ‍ॅड. पराग तिवारी, अ‍ॅड.हेमलता पतेह, अ‍ॅड. माधुरी रहांगडाले, सुरेश धुर्वे, शामराव झरारिया, कृष्णकुमार दुबे, मोसीन खान, योगेश अग्रवाल, सरपंच देवल पारधी, ईश्वर रहांगडाले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तावीक जिल्हाध्यक्ष कटरे यांनी मांडले. संचालन हुपराज जमईवार यांनी केले. आभार शामराव झरारिया यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय मेश्राम, मनोज तुरकाने, मंदाकिनी गाडवे, सरिता चव्हाण, पुरनलाल भैरम, क्रांतीकुमार सावळे, सोनू पारधी आदिंनी सहकार्य केले. (वार्ताहर )