शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

विदर्भाचा बॅकलॉग ४८ टक्के

By admin | Updated: January 13, 2015 23:01 IST

विदर्भाचा बॅकलॉग ३२ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे प्रत्येक स्थितीत विदर्भाचा बॅकलॉग, मागासपणाचा बळी ठरत आहे. मात्र शासन केवळ सर्व्हे आणि सर्वेच करीत आहे,

सावत्र वागणूक : सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ श्रीहरी अणे यांचा दावागोंदिया : विदर्भाचा बॅकलॉग ३२ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे प्रत्येक स्थितीत विदर्भाचा बॅकलॉग, मागासपणाचा बळी ठरत आहे. मात्र शासन केवळ सर्व्हे आणि सर्वेच करीत आहे, असा आरोप सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ व विदर्भवादी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.गणेशनगर येथील जे.एम. हायस्कूलच्या प्रांगणात नाग विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने विदर्भाचा बॅकलॉग व विदर्भ का वेगळा व्हावा, या विषयावर अ‍ॅड. अणे यांचे खुले व्याख्यान झाले. ते पुढे म्हणाले, सन १९८४ मध्ये तत्कालिन शासनाने विदर्भाचा बॅकलॉग म्हणजे विकासाच्या दृष्टीने मागासलेपण समजण्यासाठी दांडेकर कमिटी तयार केली होती. या कमिटीने विदर्भाचा बॅकलॉग माहीत करून घेण्यासाठी सर्वे केले. तेव्हा महाराष्ट्रापेक्षा विदर्भाचा बॅकलॉग ३२ टक्के अधिक आहे. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा विदर्भ ३२ टक्के मागासलेला असल्याचे उघड झाले. दांडेकर कमिटीने शासनाला अहवाल सादर केला. मात्र शासनाने आपल्याच कमिटीच्या सर्वेकडे दुर्लक्ष करीत तो मानन्यास नकार दिला. यानंतर हा अहवाल केंद्राला पाठविण्याची घोषणा करून १० वर्षांपर्यंत प्रलंबित ठेवले आणि आता पुन्हा एक कमिटी बनवून याबाबत सर्वे करण्यात आला. असे केवळ अहवालवर अहवाल सादर करून शासन केवळ चालढकल करीत असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. मुकेश समर्थ, वरिष्ठ अ‍ॅड. नीरज खांदेवाले, अभियंता दिनेश नायडू, छैलबिहारी अग्रवाल, किशनसिंह बैैस, के.आर. शेंडे, रंजीत जसानी व रमेश ढोमणे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी नाग विदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्ता दीपक डोहरे, सविता तुरकर, पूजा काळसर्पे, अ‍ॅड. योगेश अग्रवाल, दीपा काशिवार, लता मानकर, हामीद सिद्दिकी, प्रभात अग्रवाल, मीनाक्षी आगलावे, अ‍ॅड. पराग तिवारी, छेदी इमलाह यांनी सहकार्य केले. सव्वा तास चाललेल्या या व्याख्यानात उपस्थित शेकडो नागरिकांनी विदर्भाची खरी माहिती जाणून घेतली व वेगळ्या विदर्भाची इच्छा प्रदर्शित केली. (प्रतिनिधी)काय काय आहे विदर्भात?विदर्भात खनिज संपदा, विविध पिकांचे व विजेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येथे राजधानीच्या दृष्टीने विधानभवन व उच्च न्यायालयासह सर्व व्यवस्था आहे. विदर्भाला केवळ १५०० मेगावॅट विद्युतची गरज असताना येथे ५५०० मेगावॅट अधिक वीज उत्पन्न होते. जर विदर्भ राज्य वेगळे झाले तर अडीच रूपये युनिटच्या दराने २४ तास वीज उपलब्ध होऊ शकेल. आज विदर्भाची सर्व वीज मुंबई व पुणे यासारख्या महानगरांत उद्योगांसाठी पुरविली जात आहे. जर विदर्भात उद्योगांची वाढ झाली तर येथील वीज येथेच राहील. या क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले जाऊ शकेल. मध्य प्रदेशपासून वेगळे होऊन छत्तीसगडने जशी प्रगती केली, तशी प्रगती महाराष्ट्रपासून वेगळे झाल्यावर विदर्भाची होऊ शकेल.वेगळ्या विदर्भाची मागणी अपूर्णच...विदर्भ आंदोलनाची सुरूवात अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाला घेऊन झाली. त्यावेळी महाराष्ट्राचे नेते अकोला येथील कृषी विद्यापीठाला आपल्या क्षेत्रात नेऊ इच्छित होते. हाच मुद्दा घेऊन पहिल्या वेळी विदर्भ आंदोलन होऊन त्यात तीन विद्यार्थी शहीद झाले व या घटनेने उग्ररूप धारण केले. यानंतर जांबुवंतराव धोटे यांनी विदर्भ वेगळा करण्यासाठी आंदोलन सुरू केले. पाहता-पाहता या आंदोलनाने उंची गाठली. परंतु विदर्भाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांसमोर गुडघे टेकल्याने सदर आंदोलन फिके पडले व वेगळ्या विदर्भाची मागणी अपूर्णच राहिली.