शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

विदर्भात अवघ्या ८.५ टक्के पेरण्या

By admin | Updated: July 5, 2014 23:39 IST

मृगात बरसलेल्या पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दांडी मारल्याने विदर्भातील ११ जिल्ह्यात खरीपातील पिकं संकटात सापडली आहेत. नागपूर विभागात अवघ्या ८ टक्के तर अमरावती विभागात जेमतेम

रोपं करपताहेत : सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्पगोंदिया : मृगात बरसलेल्या पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दांडी मारल्याने विदर्भातील ११ जिल्ह्यात खरीपातील पिकं संकटात सापडली आहेत. नागपूर विभागात अवघ्या ८ टक्के तर अमरावती विभागात जेमतेम ९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आणखी दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर अंकुरलेली रोपे पूर्णपणे करपली जाऊन ती वाचविणे कठीण होणार आहे.पश्चिम विदर्भात कापूस व सोयाबीन हे खरीपातील मुख्य पिक आहे तर पूर्व विदर्भात धानाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. कापूस पट्ट्यात कमी पाण्यातही लागवड होत असल्यामुळे लागवडीचे प्रमाण जास्त आहे. मात्र पूर्व विदर्भात पावसाशिवाय धानाच्या आवत्या टाकणे किंवा पऱ्हे लावणी शक्य नाही. त्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात अवघी एक टक्के लावणी झाली आहे.नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात एकूण १८ लाख ३६ लाख ६०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी ३० जूनपर्यंत १ लाख ३९ हजार ८०० हेक्टरवर पिकांची लागवड झाली आहे. तर पश्चिम विदर्भात अर्थात अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाचे लागवड क्षेत्र ३२ लाख ८२ हजार ३०० हेक्टर आहे. आतापर्यंत त्यापैकी २ लाख ८२ हजार ३०० हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्यावर्षी अमरावती विभागात ३० जूनपर्यंत ६४ टक्के पेरणी झाली होती. मात्र यावर्षी हे प्रमाण अवघे ९ टक्के आहे.जून महिन्यात अमरावती विभागात सरासरी १५२.५ मिमी पाऊस होतो. परंतू यावर्षी जून अखेर पडलेल्या पावसाची सरासरी केवळ ४१.०० मिमी आहे. पाऊस लांबल्यामुळे कमी कालावधीत निघणाऱ्या मूग, उडीद या पिकांवर संक्रांत येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)