शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोनाचा प्रकोपाचा शेतकरी ठरतोय बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी शेतकरी काही गुंठ्यात नगदी पिके घेतात. वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, चवळी, कोबी ही भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतली जातात. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. मात्र यावर्षी नेमक्या याच काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. विवाह सोहळे रद्द करावे लागले. अनेकांनी भाजीपाल्याची मागणी नोंदवली होती.संचारबंदीमुळे घराबाहेर निघून बाजारात एवढा उत्पादित भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. अशातच उभ्या झाडावरच वांगी पिकली. अखेर हेमने या शेतकºयाला सुमारे ६ क्विंटल वांगी फेकून द्यावी लागली.कोरोनाचा यापद्धतीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देविवाह समारंभ रद्द झाल्याने वांगी फेकली । मोठे आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वांगी हे नगदी पीक आहे. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. काही आॅर्डर पण घेतले. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे विवाह समारंभ रद्द झाले. प्रतीक्षा करता करता वांगी झाडावरच पिकली. अन अखेर ती शेताबाहेर फेकून देण्याची वेळ बाकटी येथील भास्कर हेमने या शेतकऱ्यावर आली.गोंदिया जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी शेतकरी काही गुंठ्यात नगदी पिके घेतात. वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, चवळी, कोबी ही भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतली जातात. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. मात्र यावर्षी नेमक्या याच काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.विवाह सोहळे रद्द करावे लागले. अनेकांनी भाजीपाल्याची मागणी नोंदवली होती.संचारबंदीमुळे घराबाहेर निघून बाजारात एवढा उत्पादित भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. अशातच उभ्या झाडावरच वांगी पिकली. अखेर हेमने या शेतकºयाला सुमारे ६ क्विंटल वांगी फेकून द्यावी लागली.कोरोनाचा यापद्धतीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.हेमने यांनी दोन एकर शेतीत टमाटर, वांगी व मिरची पिकांची लागवड केली आहे. या पिकाचे काय होणार या विवंचनेत ते अडकले आहेत. शेतकरी मोठा असो की लहान,शेती कोरडवाहू असो की बागायती. शेतात धान असो की भाजीपाला. आज जिल्ह्यातील एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. शेतकºयांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. काल परवापर्यंत हाच शेतकरी खुश होता. मात्र कोरोनासारखे संकट घोंगावेल व आपली अशी दैना होईल असे या शेतकºयाला वाटले नव्हते.या भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांचे हाल आहेत. कधी कधी त्याने बाजारात माल आणण्यासाठी खर्च केलेल्या भाड्याचेही पैसे त्याला माल विकून मिळत नाही. अशाही अवस्थेत शेतकरी कसाबसा उत्पादन घेतो.त्यातही असे येणारे विघ्न शेतकºयांचे कंबरडे मोडतात हे नक्की.यंदा खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सातत्याने नैसर्गिक संकटाला तोंड देत आहे. नैसर्गिक संकटातून सावरत असतानाच शेतकºयांना आता कोरोनारुपी संकटाला तोंड द्यावे लागत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :agricultureशेती