शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘वंदे भारत’ रेल्वेगाडीची देखभाल-दुरुस्ती गोंदियात; काेचिंग डेपोसाठी ५० कोटींचा खर्च 

By अंकुश गुंडावार | Updated: October 8, 2022 11:09 IST

पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित होणार डेपो

गोंदिया : ‘वंदे भारत’ या हायस्पीड रेल्वे गाडीची देखभाल-दुरुस्ती वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. गोंदिया आणि बिलासपूर येथे या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार असून यासाठी स्वतंत्र डेपो तयार करण्यात येणार आहे. यात केवळ ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्यांचीच देखभाल- दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाचे महत्त्व वाढणार आहे.

‘वंदे भारत’ या हायस्पीड रेल्वेची नुकतीच सुरुवात करण्यात आली. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे ती ताशी १६० ते १८० किमी वेगाने धावते. त्यासाठी या गाडीत काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. गाडीतील बैठक व्यवस्थासुद्धा थोडी वेगळी आहे. टप्प्याटप्प्याने या रेल्वे गाड्या विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत. या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी गोंदिया आणि बिलासपूर या दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या गाड्यांचे डेपो हे स्वतंत्र असणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील वर्षी मे-जून महिन्यात या डेपोचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात गोंदिया-दुर्ग तसेच दुर्गवरून रायपूर मार्गे बिलासपूरवरून झारसगुडा येथे जाईल. तर दुसरी गाडी बिलासपूरहून संपर्क क्रांतीमार्गे दिल्ली येथे पोहाेचेल.

मोजक्याच रेल्वे स्थानकांवर थांबे

रेल्वेच्या सीआरएमएस चमूने दुर्ग ते झारसगुडा या मार्गावर ताशी १३० किमी वेगाने गाडीची ट्रायल घेतली. हे ट्रायल ‘वंदे भारत’साठी नसले तरी या मार्गावर ही सुरू करण्यास कुठलीच अडचण नसल्याचे रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या गाडीला थांबादेखील काही निवडक रेल्वे स्थानकांवर असणार आहेत.

असे आहे पहिल्या टप्प्यातील नियोजन

पहिल्या टप्प्यात ही रेल्वे बिलासपूरहून संपर्क क्रांतीमार्गे दिल्लीला जाईल. तर दुसरी गाडी गोंदिया- रायपूर- बिलासपूर मार्गे झारसगुडा येथे जाईल. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सोयीचे होणार आहे.

बिलासपूर ते दिल्ली १४ तासांत

सध्या बिलासपूर ते दिल्ली हे अंतर गाठण्यासाठी इतर रेल्वेने १८ तास लागतात. मात्र, ‘वंदे भारत’ रेल्वेने हे अंतर १४ तासांत गाठणे शक्य होणार आहे. तर गोंदियाहून ‘वंदे भारत’ गाडी सुरू झाल्यावर रायपूरहून झारसगुडा येथे पोहाेचण्यासाठी चार तास लागणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसgondiya-acगोंदिया