शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

‘वंदे भारत’ रेल्वेगाडीची देखभाल-दुरुस्ती गोंदियात; काेचिंग डेपोसाठी ५० कोटींचा खर्च 

By अंकुश गुंडावार | Updated: October 8, 2022 11:09 IST

पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित होणार डेपो

गोंदिया : ‘वंदे भारत’ या हायस्पीड रेल्वे गाडीची देखभाल-दुरुस्ती वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. गोंदिया आणि बिलासपूर येथे या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार असून यासाठी स्वतंत्र डेपो तयार करण्यात येणार आहे. यात केवळ ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्यांचीच देखभाल- दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाचे महत्त्व वाढणार आहे.

‘वंदे भारत’ या हायस्पीड रेल्वेची नुकतीच सुरुवात करण्यात आली. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे ती ताशी १६० ते १८० किमी वेगाने धावते. त्यासाठी या गाडीत काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. गाडीतील बैठक व्यवस्थासुद्धा थोडी वेगळी आहे. टप्प्याटप्प्याने या रेल्वे गाड्या विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत. या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी गोंदिया आणि बिलासपूर या दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या गाड्यांचे डेपो हे स्वतंत्र असणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील वर्षी मे-जून महिन्यात या डेपोचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात गोंदिया-दुर्ग तसेच दुर्गवरून रायपूर मार्गे बिलासपूरवरून झारसगुडा येथे जाईल. तर दुसरी गाडी बिलासपूरहून संपर्क क्रांतीमार्गे दिल्ली येथे पोहाेचेल.

मोजक्याच रेल्वे स्थानकांवर थांबे

रेल्वेच्या सीआरएमएस चमूने दुर्ग ते झारसगुडा या मार्गावर ताशी १३० किमी वेगाने गाडीची ट्रायल घेतली. हे ट्रायल ‘वंदे भारत’साठी नसले तरी या मार्गावर ही सुरू करण्यास कुठलीच अडचण नसल्याचे रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या गाडीला थांबादेखील काही निवडक रेल्वे स्थानकांवर असणार आहेत.

असे आहे पहिल्या टप्प्यातील नियोजन

पहिल्या टप्प्यात ही रेल्वे बिलासपूरहून संपर्क क्रांतीमार्गे दिल्लीला जाईल. तर दुसरी गाडी गोंदिया- रायपूर- बिलासपूर मार्गे झारसगुडा येथे जाईल. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सोयीचे होणार आहे.

बिलासपूर ते दिल्ली १४ तासांत

सध्या बिलासपूर ते दिल्ली हे अंतर गाठण्यासाठी इतर रेल्वेने १८ तास लागतात. मात्र, ‘वंदे भारत’ रेल्वेने हे अंतर १४ तासांत गाठणे शक्य होणार आहे. तर गोंदियाहून ‘वंदे भारत’ गाडी सुरू झाल्यावर रायपूरहून झारसगुडा येथे पोहाेचण्यासाठी चार तास लागणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसgondiya-acगोंदिया