शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

‘वंदे भारत’ रेल्वेगाडीची देखभाल-दुरुस्ती गोंदियात; काेचिंग डेपोसाठी ५० कोटींचा खर्च 

By अंकुश गुंडावार | Updated: October 8, 2022 11:09 IST

पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित होणार डेपो

गोंदिया : ‘वंदे भारत’ या हायस्पीड रेल्वे गाडीची देखभाल-दुरुस्ती वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. गोंदिया आणि बिलासपूर येथे या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार असून यासाठी स्वतंत्र डेपो तयार करण्यात येणार आहे. यात केवळ ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्यांचीच देखभाल- दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाचे महत्त्व वाढणार आहे.

‘वंदे भारत’ या हायस्पीड रेल्वेची नुकतीच सुरुवात करण्यात आली. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे ती ताशी १६० ते १८० किमी वेगाने धावते. त्यासाठी या गाडीत काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. गाडीतील बैठक व्यवस्थासुद्धा थोडी वेगळी आहे. टप्प्याटप्प्याने या रेल्वे गाड्या विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत. या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी गोंदिया आणि बिलासपूर या दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या गाड्यांचे डेपो हे स्वतंत्र असणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील वर्षी मे-जून महिन्यात या डेपोचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात गोंदिया-दुर्ग तसेच दुर्गवरून रायपूर मार्गे बिलासपूरवरून झारसगुडा येथे जाईल. तर दुसरी गाडी बिलासपूरहून संपर्क क्रांतीमार्गे दिल्ली येथे पोहाेचेल.

मोजक्याच रेल्वे स्थानकांवर थांबे

रेल्वेच्या सीआरएमएस चमूने दुर्ग ते झारसगुडा या मार्गावर ताशी १३० किमी वेगाने गाडीची ट्रायल घेतली. हे ट्रायल ‘वंदे भारत’साठी नसले तरी या मार्गावर ही सुरू करण्यास कुठलीच अडचण नसल्याचे रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या गाडीला थांबादेखील काही निवडक रेल्वे स्थानकांवर असणार आहेत.

असे आहे पहिल्या टप्प्यातील नियोजन

पहिल्या टप्प्यात ही रेल्वे बिलासपूरहून संपर्क क्रांतीमार्गे दिल्लीला जाईल. तर दुसरी गाडी गोंदिया- रायपूर- बिलासपूर मार्गे झारसगुडा येथे जाईल. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सोयीचे होणार आहे.

बिलासपूर ते दिल्ली १४ तासांत

सध्या बिलासपूर ते दिल्ली हे अंतर गाठण्यासाठी इतर रेल्वेने १८ तास लागतात. मात्र, ‘वंदे भारत’ रेल्वेने हे अंतर १४ तासांत गाठणे शक्य होणार आहे. तर गोंदियाहून ‘वंदे भारत’ गाडी सुरू झाल्यावर रायपूरहून झारसगुडा येथे पोहाेचण्यासाठी चार तास लागणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसgondiya-acगोंदिया