शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

वणव्यामुळे वनसंपत्तीचे नुकसान

By admin | Updated: March 31, 2016 01:58 IST

तालुक्यातील जंगलामध्ये अनेक ठिकाणी वनव्यामुळे वन संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे जिवंत दृश्य दिसून येत आहेत.

वन्यजीवांना धोका : मोहफुले वेचणाऱ्यांवर नियंत्रणाची गरजसालेकसा : तालुक्यातील जंगलामध्ये अनेक ठिकाणी वनव्यामुळे वन संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे जिवंत दृश्य दिसून येत आहेत. जंगलामध्ये आग लागण्याच्या घटना सतत घडत असतानासुद्धा वनविभागाचे कर्मचारी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडून वणवा नियंत्रित करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. तर दुसरीकडे वनव्यामुळे लाख मोलाची वृक्षसंपत्ती आणि तृणभक्षी वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील संतुलन बिघडण्यासाठी हे वणवे कारणीभूत ठरत आहेत.सालेकसा तालुक्यात लोकसंख्येचे घनत्व कमी आहे. या तालुक्याला निसर्गाने अनमोल संपत्तीच्या रुपात पर्वत, नद्या, जंगले, वन्यपशू, पक्षी, तलाव, झरे, दऱ्या इत्यादी वरदान स्वरुपात दिले आहे. परंतु ही संपत्ती योग्यप्रकारे संरक्षण केली जात नाही. नैसर्गिक संपत्तीचे नुकसान करण्यामागे काही स्वार्थी तत्व लागले असतात. तसेच शासनाने ज्या लोकांना नैसर्गिक संपत्तीच्या रक्षणाची मोठी जबाबदारी दिली, तो वन विभाग आपल्या कर्तव्याचे योग्य पालन न करता किंवा त्यांना जनतेचे योग्य सहकार्य लाभत नसल्यामुळे यंत्रणा नेहमी अपयशी ठरत आहे, हे या तालुक्याचे दुर्भाग्यच मानावे लागेल.दरवर्षी पानगडीचा मोसम सुरू होताच जंगलातील झाडांची पाने गडून खाली पडतात. हळूहळू झाडांची सर्व पाने खाली पडतात आणि पालापाचोळ्याचा एक जाड थर जमिनीवर बनतो. एवढ्यात मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होत असल्याने जमिनिवर पडलेला पाळापाचोळा वाळतो. तसेच अनेक वृक्षसुद्धा वाळतात. एवढेच नव्हे तर जंगलात झाडांपासून तुटून पडलेले, कापलेले किंवा वादळी वाऱ्यामुळे उखडून पडलेले अनेक मोठे वृक्ष आणि फांद्या सुकलेल्या वाळलेल्या स्थितीत पडून असतात. एवढ्यात जंगलाला आग लागली की, संपूर्ण जंगल परिसरात वणवा भयावह रुप धारण करतो. त्यात पालापाचोळ्यासह किमती लाकूडसुद्धा जळून खाक होतात व लाख मोलाचे किमती लाकूड नष्ट होते. तसेच पालापाचोळ्याखाली विचरण करीत असलेले अनेक छोटेमोठे कीटक, साप व इतर शेकडो प्रकारचे सरपटणारे जीवसुद्धा आगीत होरपडून मरतात. एकदा वणवा लागला की संपूर्ण जंगल परिसर व उंच पहाडापर्यंत वणवा भयावह रुप घेतो. त्यामुळे पहाडावरीलसुद्धा किमतीवृक्ष व प्राणी धोक्यात येतात. पानगडी ओसरल्यावर वसंत ऋतूमध्ये सर्व छोट्यामोठ्या झाडांना नवीन पालवी व पाने फुटतात. ही हिरवळ वनस्पती तृणभक्षी प्राण्यांसाठी आवडता आहार असते. परंतु वणव्यामुळे जमिनीवरील सर्व हिरवे गवत, पालवी, पानेसुद्धा जळून जातात. तसेच वणव्याच्या भडका उंच झाडापर्यंत पोहोचल्याने झाडांची पानेसुद्धा जळून पडतात. त्यामुळे हरीण, सांभार, चितळ, ससा व इतर तृणभक्षी प्राण्यांचे आहार नष्ट होते. त्यामुळे तृणभक्षी प्राण्याचे जंगलातून पलायन होते. कधी कधी ते प्राणीसुद्धा वणव्याच्या जाळ्यात येतात आणि जीव गमावून बसतात. वनव्यामुळे पक्ष्यांची घरटी व त्यातील अंडी, पिल्लेसुद्धा नष्ट होतात. एकंदरीत वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादी संपत्तीची क्षती होते.तालुक्यात बिजेपार, दरेकसा आणि पिपरीया परिसरात मोठ्या प्रमाणावर घनदाट वनांनी वेढलेले क्षेत्र आहे. यात इमारती लाकूड, औषधीय गुणांनी भरपूर वृक्ष, फळदार वृक्ष तसेच विविध प्रकारच्या फर्निचरसाठी उपयोगी किमती लाकूड देणारे वृक्ष भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच तृणभक्षी व हिंसक प्राण्यांचेही विचरण या जंगलात असते. तालुक्यासाठी ही एक मोठ्या अभिमानाची बाब आहे, परंतु दरवर्षी वणव्यामुळे लाखोची वनसंपत्ती नष्ट होते, हे वास्तव आहे. वणवा कशामुळे लागतो?जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर मोहफुलांची झाडे आहेत. मार्च, एप्रिलमध्ये या झाडांना फुले येतात. मोहफुले खाली पडल्यावर त्याला वेचणारे लोक झाडाखाली पालापाचोळा पडलेला असल्यास त्याला हटविण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आग लावतात. ती आग झाडाखालच्या परिसरापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण जंगलात पसरते आणि वणव्याचे रुप धारण करते. जंगलात वावरणारे काही लोक बिड्या ओढतात, बिड्या सुलगवतात. जळत असलेली आगपेटीची कांडी जंगलात फेकतात किंवा जळत असलेली बिडी अर्धवट पिऊन जंगलात फेकतात. त्यामुळेही जंगलात वणवा लागतो. बांबूच्या रांझ्या एकमेकांना रगडत असतानासुद्धा आग निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु असे क्वचितच होते. अधिकतर जंगलात लागलेली आग ही जंगलासाठी दयादृष्टी न दाखविणाऱ्या लोकांमुळेच लागते आणि वणव्याचे रूप धारण करते.सदर लोकमत प्रतिनिधी तालुक्यातील जंगल परिसरात फिरत असता बिजेपार, दरेकसा क्षेत्रातील जंगलामध्ये अनेक ठिकाणी भीषण वणवा लागल्या नंतरचे दृश्य दिसून आले. हिरवेगार जंगल निर्जन क्षेत्रासारखे दिसून येत होते. लाख मोलाचे किमती लाकूडसुद्धा जळताना दिसून आले. तसेच तिथून निघणारे धूर जंगलातील शुद्ध वातावरणाला प्रदूषित करीत असल्याचे दिसत होते. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असून अधिकाऱ्यांनी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देणे गरजेचे आहे.