शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, रब्बी धानपिकांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:52 IST

बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा कापणी केलेल्या ६ ते ७ हजार हेक्टरमधील धानाला बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

गोंदिया : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्यात अवकाळी पाऊस अधूमधून हजेरी लावत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांची तारांबळ उडाली होती. तोक्ते वादळाच्या पार्श्वभुमीवर हवामान विभागाने काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो खरा ठरत आहे. बुधवारी (दि.१९) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे लोट निघाले होते. वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली. तसेच काही व्यावसायीक प्रतिष्ठाणांच्या टिनच्या छताचीही पडझड झाली होती. जिल्ह्यात रब्बी धानाची कापणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. त्यातच अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा कापणी केलेल्या ६ ते ७ हजार हेक्टरमधील धानाला बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांवरील अवकाळीचे संकट कायम आहे. 

उघड्यावरील धानाला फटका -जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने मागील खरीप हंगामात ३३ लाख क्विंटल धान खरेदी केले. त्यांपैकी जवळपास दीड लाख क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. या धानाला मागील सात आठ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

तुर्तास धान कापणी नकोच -यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण ६६ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. यापैकी ७ ते ८ हजार हेक्टरमधील धानाची कापणी पूर्ण झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध्यामध्ये धान पडून आहे. या धानाला बुधवारी आलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले. तर हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तुर्तास धानाची कापणी न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी