शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनारेश्वरालयात तुळशी विवाहाची अनोखी परंपरा

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

हिंदू संस्कृतीत तुळशीविवाह झाला की उपवर-वधूंचे लग्न जुळविण्याच्या कामांना सुरूवात केली जाते. त्यामुळे तुळशीविवाहाची वाट अनेक जण पाहात असतात. अंगणातील तुळस आणि भगवान

नामदेव हटवार ल्ल सालेकसाहिंदू संस्कृतीत तुळशीविवाह झाला की उपवर-वधूंचे लग्न जुळविण्याच्या कामांना सुरूवात केली जाते. त्यामुळे तुळशीविवाहाची वाट अनेक जण पाहात असतात. अंगणातील तुळस आणि भगवान कृष्णाचा विवाह लावण्याची ही परंपरा घरोघरी पाळल्या जाते. मात्र त्याला मर्यादित स्वरूप असते. फार तर शेजारच्या दोन-चार घरातील लोक वऱ्हाडी म्हणून या लग्नाला असतात. मात्र एखाद्या खरोखरच्या लग्नाला असावे अशा वऱ्हाड्यांच्या गराड्यात आणि लग्नाचे सर्व सोपस्कार केले जाणारा ‘तुळशी विवाह’ पहायला असेल तर हलबीटोल्यातील अर्धनारेश्वरालयात मंगळवारी जरूर या.श्रमदानातून साकारलेल्या सालेकसा तालुक्यातील अर्धनारेश्वरालय या ठिकाणी २००४ पासून अशा पद्धतीने तुळशी विवाह भव्य स्वरूपात पार पाडण्याची प्रथा सुरू करण्यात आली. गतवर्षी ९०० वऱ्हाड्यांच्या साक्षीने हा समारंभ झाला होता. यावर्षी एक हजार लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी खास विवाहपत्रिकाही छापण्यात आल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावातील लोकांसह नागपूरपासून रायपूरपर्यंतच्या अनेक लोकांनाही यासाठी निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.तुळशी विवाहाच्या निमित्ताने मंडप टाकणे, परिसर सजविणे, येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे, आदरातिथ्य करणे ही सर्व कामे करण्यात येतात. येणाऱ्या प्रत्येकासाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात येते. आतषबाजी, बँडबाजा असे सर्वच इथे पहायला मिळते. तुळशी आणि शालिग्राम (श्रीकृष्णाचे शापित रूप) च्या रुपातील काळा दगड यांच्यात अंतरपाट ठेवून हा विवाह समारंभ लावल्या जातो. विवाहाच्यावेळी विधी पूर्वधक मंत्रपठण लांजी (ककोडी) येथील विश्वनाथ तिवारी महाराज पार पाडत असतात. मंगलाष्टकेही म्हटल्या जातात. मांडव सोन्याचा घातिला,किस्रदेव हा उभा राहिला हाती शोभे वरमालाअशी लग्नाची गाणीही वऱ्हाड्यांना ऐकायला मिळतात. त्यात तुळशीचे महत्व विषद करताना जिला नाही लेक, तिने तुळस लावावी,तिच्या दारी येई, गोविंद लेक-जावईअशी गीतेही ऐकायला मिळतात. तुळशी विवाहाचे महत्व सांगण्यासोबतच हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठीही जनजागृती केली जाते. एका बाजूला मुलगा हवा म्हणून स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत असताना कन्यादानाखेरीज जीवनाचे सार्थक नाही याचेही महत्व या ठिकाणी सांगितले जाते.