शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी अवैध बांधकामाचे नगरपंचायतीकडून समर्थन?

By admin | Updated: March 10, 2017 00:43 IST

सांडपाण्याच्या पाईपलाईनचे बांधकाम अडवून स्वयंपाक घरालगत मलमूत्र टाकीचे विनापरवानगीने अवैध बांधकाम होत असल्याचा

तक्रारीकडे दुर्लक्ष : जोशी दाम्पत्याचा पत्रपरिषदेत आरोपअर्जुनी मोरगाव : सांडपाण्याच्या पाईपलाईनचे बांधकाम अडवून स्वयंपाक घरालगत मलमूत्र टाकीचे विनापरवानगीने अवैध बांधकाम होत असल्याचा आरोप प्रभाक क्र.१३ येथील प्रफुल्ल जोशी यांनी पत्रपरिषदेत केला. नगर पंचायतचे मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करुनही हेतुपुरस्सर कानाडोळा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.प्रभाग क्र.१३ मध्ये जोशी यांच्या घरालगत विजय मडावी यांचे घर आहे. त्यांनी नियमान्वये जागा न सोडता शौचालयाच्या टाकीचे बांधकाम सुरू केले. यासाठी त्यांनी नगर पंचायतीकडून बांधकामाची परवानगी घेतली नाही. याबाबत हटकले असता अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत अडकविण्याची धमकी देतो. त्यांनी यापूर्वी सांडपाण्याचा पाईप तोडला, त्यावेळी तंटामुक्त गाव समिती व तत्कालीन ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. मात्र हा वाद अद्यापही प्रलंबितच आहे. मडावी यांनी जुने घर पाडून नवीन बांधकाम सुरू केले. घराची जागा भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी केल्याशिवाय बांधकामाची परवानगी देण्यात येऊ नये, अशी तक्रार तत्कालीन ग्रामपंचायतीकडे ३० एप्रिल २०१४ रोजी केली होती. मात्र या अर्जाचा विचारच केला गेला नाही. विनापरवानगीने अवैध बांधकाम सुरू आहे.नगर पंचायतचे उपाध्यक्ष विजय कापगते व बांधकाम सभापती माणिक मसराम यांना मडावी यांच्या बांधकामाची कल्पना दिली. त्यांनी मौकाचौकशी केली. नगर पंचायतीचे अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे २० फेब्रुवारी रोजी आयोजित बैठकीत हा मुद्दा चर्चेला आणण्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीविषयी चौकशी केली तेव्हा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क केला तेव्हा त्यांनी मडावी यांना बांधकामाची परवानगी दिली नाही. त्यांचे खासगी बांधकाम आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करु शकता, असे सांगून टाळाटाळ केली. २३ फेबुवारी रोजी उपाध्यक्षांशी संपर्क केला तेव्हा माझ्या कक्षात नाही, मुख्याधिकाऱ्यांचा आहे, असे सांगण्यात आले. परत मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क केला, तेव्हा सर्व बाबी फोनवरच सांगणार काय? माझ्याकडे अभियंता नाहीत. अप्रिशिक्षित लोक आहेत आणि माझ्या कक्षेत येत नसल्याने काहीच करू शकत नाही, असे सांगितले.२३ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज केला, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागा, असे सांगण्यात आले. ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, तहसील कार्यालय व नगर पंचायत यांच्या कार्यकक्षेत अवैध बांधकामाचा मुद्दा येत नसेल तर न्याय मागायचा कुठे, हा प्रश्न पडतो. यामुळे गावात अनेक अवैध बांधकाम वृद्धींगत होत आहेत. अतिक्रमण वाढले आहेत. यासाठी नगर पंचायतच जबाबदार आहे. गेल्या सहा महिन्यांत नगर पंचायतची एकही बैठक झाली नाही. यामुळे अन्यायग्रस्त त्रस्त झाले आहेत, असा पत्रपरिषदेत आरोप करुन जोशी यांनी चौकशीची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)