शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

दोन ट्रकची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:33 IST

वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील कुंभीटोला-येरंडी दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील साई ढाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही दुर्घटना सोमवारी (दि.६) सकाळी ८.१५ वाजतादरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

ठळक मुद्देचालकाचा मृत्यू : कुंभीटोला-येरंडी दरम्यान भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील कुंभीटोला-येरंडी दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील साई ढाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही दुर्घटना सोमवारी (दि.६) सकाळी ८.१५ वाजतादरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते. दोन्ही चालकांना क्रेन व जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.ट्रक क्रमांक सीजे ०७-एझेड ८९९५ हा ट्रक रायपूरच्या दिशेने जात होता. तर ट्रक क्रमांक एमएच ३४-एव्ही ८८६७ हा वडसाकडे जात होता. याचा ट्रकचालक ही दुर्घटना घडण्याचा पाच मिनिटांपूर्वी कुंभीटोला येथील रेस्टारेंटमध्ये चहापानासाठी थांबला होता. अगदी दीड किमी अंतरावर गेल्यानंतर या दोन्ही ट्रकची अगदी समोरासमोर जबर धडक झाली. दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. दोन्ही ट्रकमध्ये केवळ चालकच असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही चालक कॅबिनमध्ये फसलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.तब्बल दोन तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. ट्रका चालक शुभम देवतादीन पाल (२६,रा. डोमीपूर कुटेलीया, उत्तरप्रदेश) व गोपी अंजूदीया यादव (२७,रा.बगमा, बिहार) जबर जखमी झाल्याने त्यांना नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गोपी यादव याचा सुमारे १२ वाजता मृत्यू झाला तर शुभम पाल याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. आरोपी मृत गोपी यादव याच्यावर कलम २७९, ३०४ (अ), ३३८ भादंवि सहकलम १८४ मोवा का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार साईनाथ नाकाडे हे तपास करीत आहेत.उत्तरीय तपासणीसाठी विलंबगोपी यादव याच्या मृत्यूनंतर उत्तरीय तपासणीसाठी नवेगावबांध पोलिसांनी दस्तावेज तयार करुन नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यांनी सायंकाळी ५ वाजता उत्तरीय तपासणी करु असे सांगितले. मात्र ६ वाजतापर्यंत उत्तरीय तपासणी झाली नव्हती. यामुळे संताप व्यक्त केला जात होता. याची चौकशी करुन आरोग्य यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.