शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

दोन ट्रकची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:33 IST

वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील कुंभीटोला-येरंडी दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील साई ढाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही दुर्घटना सोमवारी (दि.६) सकाळी ८.१५ वाजतादरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

ठळक मुद्देचालकाचा मृत्यू : कुंभीटोला-येरंडी दरम्यान भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील कुंभीटोला-येरंडी दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील साई ढाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही दुर्घटना सोमवारी (दि.६) सकाळी ८.१५ वाजतादरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते. दोन्ही चालकांना क्रेन व जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.ट्रक क्रमांक सीजे ०७-एझेड ८९९५ हा ट्रक रायपूरच्या दिशेने जात होता. तर ट्रक क्रमांक एमएच ३४-एव्ही ८८६७ हा वडसाकडे जात होता. याचा ट्रकचालक ही दुर्घटना घडण्याचा पाच मिनिटांपूर्वी कुंभीटोला येथील रेस्टारेंटमध्ये चहापानासाठी थांबला होता. अगदी दीड किमी अंतरावर गेल्यानंतर या दोन्ही ट्रकची अगदी समोरासमोर जबर धडक झाली. दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. दोन्ही ट्रकमध्ये केवळ चालकच असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही चालक कॅबिनमध्ये फसलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.तब्बल दोन तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. ट्रका चालक शुभम देवतादीन पाल (२६,रा. डोमीपूर कुटेलीया, उत्तरप्रदेश) व गोपी अंजूदीया यादव (२७,रा.बगमा, बिहार) जबर जखमी झाल्याने त्यांना नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गोपी यादव याचा सुमारे १२ वाजता मृत्यू झाला तर शुभम पाल याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. आरोपी मृत गोपी यादव याच्यावर कलम २७९, ३०४ (अ), ३३८ भादंवि सहकलम १८४ मोवा का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार साईनाथ नाकाडे हे तपास करीत आहेत.उत्तरीय तपासणीसाठी विलंबगोपी यादव याच्या मृत्यूनंतर उत्तरीय तपासणीसाठी नवेगावबांध पोलिसांनी दस्तावेज तयार करुन नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यांनी सायंकाळी ५ वाजता उत्तरीय तपासणी करु असे सांगितले. मात्र ६ वाजतापर्यंत उत्तरीय तपासणी झाली नव्हती. यामुळे संताप व्यक्त केला जात होता. याची चौकशी करुन आरोग्य यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.