शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

दोन ट्रकची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:33 IST

वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील कुंभीटोला-येरंडी दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील साई ढाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही दुर्घटना सोमवारी (दि.६) सकाळी ८.१५ वाजतादरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

ठळक मुद्देचालकाचा मृत्यू : कुंभीटोला-येरंडी दरम्यान भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील कुंभीटोला-येरंडी दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील साई ढाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही दुर्घटना सोमवारी (दि.६) सकाळी ८.१५ वाजतादरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते. दोन्ही चालकांना क्रेन व जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.ट्रक क्रमांक सीजे ०७-एझेड ८९९५ हा ट्रक रायपूरच्या दिशेने जात होता. तर ट्रक क्रमांक एमएच ३४-एव्ही ८८६७ हा वडसाकडे जात होता. याचा ट्रकचालक ही दुर्घटना घडण्याचा पाच मिनिटांपूर्वी कुंभीटोला येथील रेस्टारेंटमध्ये चहापानासाठी थांबला होता. अगदी दीड किमी अंतरावर गेल्यानंतर या दोन्ही ट्रकची अगदी समोरासमोर जबर धडक झाली. दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. दोन्ही ट्रकमध्ये केवळ चालकच असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही चालक कॅबिनमध्ये फसलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.तब्बल दोन तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. ट्रका चालक शुभम देवतादीन पाल (२६,रा. डोमीपूर कुटेलीया, उत्तरप्रदेश) व गोपी अंजूदीया यादव (२७,रा.बगमा, बिहार) जबर जखमी झाल्याने त्यांना नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गोपी यादव याचा सुमारे १२ वाजता मृत्यू झाला तर शुभम पाल याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. आरोपी मृत गोपी यादव याच्यावर कलम २७९, ३०४ (अ), ३३८ भादंवि सहकलम १८४ मोवा का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार साईनाथ नाकाडे हे तपास करीत आहेत.उत्तरीय तपासणीसाठी विलंबगोपी यादव याच्या मृत्यूनंतर उत्तरीय तपासणीसाठी नवेगावबांध पोलिसांनी दस्तावेज तयार करुन नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यांनी सायंकाळी ५ वाजता उत्तरीय तपासणी करु असे सांगितले. मात्र ६ वाजतापर्यंत उत्तरीय तपासणी झाली नव्हती. यामुळे संताप व्यक्त केला जात होता. याची चौकशी करुन आरोग्य यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.