शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

दोन भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:02 AM

दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली;.....

ठळक मुद्देधोबीसराड येथील घटना : मुले पळविणारी टोळी सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली; मात्र याची माहिती देवरी पोलिसांना बुधवारी (दि.१६) देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आली. या घटनेमुळे देवरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.अंकुश बबन बागडे (१३) आणि चंद्रशेखर बबन बागडे (९) रा. धोबीसराड असे अपहरण करण्याचा प्रयत्न झालेल्या दोन्ही सख्ख्या भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (दि.१४) दुपारी २ वाजताच्या सुमारास हे दोघेही भाऊ घरच्या शेळ्या चारायला गावालगत असलेल्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या बाजूला गेले होते.दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन व्यक्तींपैकी एका व्यक्तिने दोन्ही भावांच्या जवळ येत त्यांना १०-१० रुपये खाऊ खाण्यास दिले. तसेच पुन्हा प्रत्येकी शंभर रुपये देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांना तुमच्या गावात किती लहान मुले आहेत. येथे घनदाट झुडूप कुठे आहे, अशी विचारपूस त्यांना केली. तसेच त्यांच्या खांद्यावर हात ठेवत तुझ्या दोन्ही किडनी बरोबर आहेत की नाही, अशी विचारणा केली. त्यामुळे अंकुशला मुलांना चोरुन नेणारे तर हे व्यक्ती नाही ना, अशी शंका आली.त्यांनी आम्ही इकडे शेळी चारायला आलो आहोत. जर शेळ्या इकडे-तिकडे गेल्या तर आमचे वडील रागावतील. त्यामुळे आम्ही घरी शेळ्या सोडून येतो, असे त्या अज्ञात व्यक्तींना सांगून दोन्ही भाऊ घरी परत आले. त्यानंतर दोन्ही भावांनी घडलेला हा सर्व प्रकार वडिलांना सांगितला. वडील बबन बागडे यांनी त्यांच्या शेजारी राहणारे राजू पटले व सदन खोटे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर राजू पटले यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. तिथे जावून त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा तिथे लपून बसलेल्या दोन व्यक्तिंनी पळ काढला. तर त्यांच्यापैकी एकजणाने शौचास बसल्याचा देखावा केला. त्याच्याजवळ जाऊन राजू पटले यांनी तू येथे काय करीत आहेस, अशी विचारणा केली.तेव्हा त्या व्यक्तीने पटले यांना खाली पाडून खिशातील चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पटले चांगलेच घाबरले. त्यांनी घाबरेल्या अवस्थेतच सदर व्यक्तीच्या तोंडावर बुक्की मारुन तिथून पळ काढला. त्यानंतर गावात पोहचून घडलेला सर्व प्रकार गावकºयांना सांगितला.गावकºयांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घातली. तेव्हा तिथे कुणीच आढळला नाही. यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील व देवरी पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेबाबद चौकशी चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे देवरी तालुक्यात मुलांना पळवून नेणारी टोळी तरी सक्रिय नाही ना? अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दोन भावडांच्या अपहरणाप्रकरणाची तोंडी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्या आधारावर आम्ही तपास केला असून अद्यापही काही सुगावा लागलेला नाही.- राजेश तटकरे,पोलीस निरीक्षक देवरी.

टॅग्स :Kidnappingअपहरण