शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रेल्वे रूळाखाली दबून दोन मजूर ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 18:59 IST

एक मजूर गंभीर जखमी : गोंदिया-बालाघाट रेल्वे मार्गावरील घटना

गोंदिया : गोंदिया-बालाघाट रेल्वे मार्गावर पाईप व केबल टाकण्याचे काम करीत असताना माती खचल्याने त्याखाली दबून दोन मजूर ठार तर एक मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.२३) सायंकाळी ५ वाजता सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर घडली. 

 राजेश देवलाल शरणागत (३५) आणि अंकर पंधरवार (३५) ,रा.शिवनी, रावणवाडी असे मृत मजुरांची तर चंद्रविलास शहारे (२५) रा.लहीटोला, असे जखमी मजुराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ पासून काही अंतरावर रूळाखाली पाईप व केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावर चार मजूर कार्यरत होते. मात्र हे काम करीत असताना शेजारच्या रूळावरून गाडी गेल्याने जमिनीत कंपन झाले आणि रूळाखाली पॉर्इंट टाकण्यासाठी जागा बनविण्यासाठी असलेले मजूर त्या माती व गिट्टीखाली दबले. यात राजेश शरणागत व अंकर पंधरवार जागीच ठार झाले. तर चंद्रविलास शहारे हा गंभीर जखमी झाला. त्यांच्या सोबत काम करीत असलेल्या चौथा मजूर सुदैवाने बचावला. त्यानेच याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. 

दरम्यान या घटनेमुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर काहीकाळ गोंधळ उडाला होता. रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमी मजुराला रुग्णालयात दाखल केले. या कामाचे कंत्राट रेल्वेने भगवती कंस्ट्रक्शन कंपनीला दिले असून घनश्याम प्रमर यांची ही कंपनी असल्याचे सांगितले जाते. रेल्वे पोलिसांनी प्रकरण नोंद केले असून कंत्राटदाराला ठाण्यात बोलाविले होते. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

टॅग्स :railwayरेल्वे