शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

गोंदिया जिल्ह्यातील ओवारा धरणात बुडून दोन बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:49 IST

देवरी तालुक्यातील ओवारा धरणात आंघोळीकरीता गेलेल्या चार बालकांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. तर दोन बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. ही घटना मंगळवार (दि.२२) सकाळी ११.३० वाजता घडली.

ठळक मुद्देदोन जण बचावलेदेवरी तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्यातील ओवारा धरणात आंघोळीकरीता गेलेल्या चार बालकांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. तर दोन बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. ही घटना मंगळवार (दि.२२) सकाळी ११.३० वाजता घडली.मृतकांमध्ये शुभम रामचंद्र मोरदेवे (१३), अश्विनी भोजराज मेश्राम (१४) यांचा समावेश आहे. तर विश्वेश्वरी परतेती (१४) आणि रोशनी मोरदेवे (१३) यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. प्राप्त माहितीनुसार शुभम, अश्विनी, रोशनी आणि विश्वेश्वरी ही चारही ओवार येथील चारही बालके सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओवारा धरणावर आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, ही चारही बालके आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा थांग न लागल्याने पाण्यात बुडायला लागले. दरम्यान धरणावर कपडे धुत असलेल्या महिलांना बालके बुडत असल्याचे आढळताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजुबाजुच्या शेतामध्ये काम करीत असलेल्या मजुर व गावकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. तसेच बुडत असलेल्या बालकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभम व अश्विनी यांचा मृत्यू झाला. तर विश्वेश्वरी आणि रोशनी यांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी देवरी पोलीस स्टेशन दिली. या घटनेमुळे ओवारा गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात