शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

एकाच महोत्सवाचे दोनदा उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:26 IST

कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ फेब्रुवारी या पाच दिवशीय जिल्हा कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, साईनगर येथे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअनेकांची दांडी : जनजागृतीचा अभाव, ढिसाळ नियोजन, शेतकºयांपर्यंत माहितीच न पोहोचल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ फेब्रुवारी या पाच दिवशीय जिल्हा कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, साईनगर येथे करण्यात आले आहे. मात्र या महोत्सवाचे सलग दोनदा उद्घाटन झाल्याने या महोत्सवाची चांगलीच चर्चा आहे. तर कृषी विभागाचे ढिसाळ नियोजन आणि जनजागृतीचा अभावाचा या महोत्सवाला फटका बसल्याचे चित्र होते.कृषी व पलास महोत्सवाचे उदघाटन १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. परंतु पहिल्या दिवशी उदघाटनाला पालकमंत्री न पोहचल्याने पुन्हा रविवारी (दि.१८) पालकमंत्र्यांना बोलावून या महोत्सवाचे दुसऱ्यांदा उद्घाटन करण्यात आले. दरम्यान या प्रकाराने स्टॉलधारकांसह शेतकरी सुध्दा आश्चर्य चकीत झाले. कृषी विभागाच्या नियोजन शुन्यतेमुळे निमंत्रण दिलेल्यांपैकी अनेकांनी या महोत्सवाकडे पाठ दाखविल्याची माहिती आहे.प्राप्त महोत्सवाचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, मुकाअ राजा दयानिधी उपस्थित होते. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता पुन्हा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुकाअ राजा दयानिधी, जि.प. जि.प. सभापती शैलजा सोनवाने, अ.भा. भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे व प्रगतीशिल शेतकरी उपस्थित होते.कृषी महोत्सवातून शेतकरीच गायबकृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांसाठी हे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यापर्यंत या महोत्सवाची माहिती पोहचविण्यात कृषी विभागाला अपयश आले. त्यामुळे कृषी महोत्सवात शेतकरी गायब असल्याचे चित्र होते. महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या भव्य डोममधील शेकडो रिकाम्या खुर्च्या बरेच काही सांगून जात होते. तर महोत्सवस्थळी १८० स्टॉल लावण्यात आले असून याकडे नागरिकच भटकत नसल्याने स्टॉल धारकांच्या चेहऱ्यावर देखील त्याचे भाव दिसून येत होते.पाच दिवसांच्या आयोजनावर १४ लाखांचा खर्चपाच दिवस चालणाºया या प्रदर्शनीसाठी १४ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनीत सेंद्रिय तांदळाचे प्रदर्शन व विक्री, गटशेतीबाबत माहिती व मार्गदर्शन, यांत्रिकीकरण व शेतीविषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, जलयुक्त शिवार अभियानाबाबत माहिती व मार्गदर्शन, कृषीविषयक अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती, महिला बचतगटांनी उत्पादित केलेले चटपटीत खाद्यपदार्थ, हातकुटीचे तांदूळ, पोहे, घरगुती पापड, मसाले, मत्स्यलोणचे, वळी, शेवया, पळस चहा, आंबाडी शरबत, हस्तकला, प्रदर्शन व विक्री, जातीवंत पशू व पक्षांचे प्रदर्शन आणि आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी १८० स्टॉल लावण्यात आले आहेत. लाखो खर्च करून मोठे शामीयाना उभारण्यात आले आहे.महोत्सवाला अनेकांची दांडीकृषी महोत्सवासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून जलपुरूष व द रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह, जल व भू व्यवस्थापन संस्था औरंगाबादचे प्रमुख प्रा. राजेंद्र पुराणिक यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले. मात्र ते महोत्सवाला आलेच नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत निमंत्रण पत्रिका पोहचली की अशी चर्चा महोत्सव परिसरातच होती.