शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

तंटामुक्तीमुळे दोन हजार ज्येष्ठ नागरिक झाले सन्मानित

By admin | Updated: October 25, 2014 22:43 IST

ज्येष्ठ नागरिकांना गावात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या बक्षीस विनियोगात जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचे प्रावधान केले आहे.

गोंदिया : ज्येष्ठ नागरिकांना गावात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या बक्षीस विनियोगात जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचे प्रावधान केले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावात दोन हजारापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार झाला आहे. महाराष्ट्र शासनाने गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमलात आली. या मोहिमेंंतर्गत गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून गावाला विकासाच्या वाटेवर नेणारे उपक्रम समित्यांनी राबविले. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवून गावातील ज्येष्ठ नागरिकाला आपल्या समस्या समाजापुढे मांडता याव्यात यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तंटामुक्त गाव मोहिमेच्या बक्षीस नियोजन कार्यक्रमात बोलावण्यात येत आहे. आजच्या स्थितीत संयुक्त कुटुंब पध्दती कालबाह्य ठरली आहे. मी, माझी पत्नी व माझी मुले यातच समाधान मानून आई-वडिलांना दुरावणारी मुले आजही समाजात आहेत. या मुलांना आपल्या आई-वडिलांप्रती आपुलकी वाटावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतला आहे.एक समिती कमीत कमी गावातील पाच ते सहा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांचा सन्मान राखण्यासाठी पावले उचलत आहेत. तंटामुक्तीमुळे वाळीत टाकल्या जाणाऱ्या वृध्दांचा सन्मान झाल्याने ज्येष्ठ नागरिकांचा प्रति गावकऱ्यांचीच नाही तर त्यांचा मुलांमध्येही सन्मानजनक भावना निर्माण करण्यात ही मोहीम यशस्वी राहीली आहे. जिल्ह्यात सन २००७-०८ मध्ये ५६ गावे, सन २००८-०९ मध्ये २६२ गावे, २००९-१० मध्ये २०५ गावे तर उर्वरीत ३३ गावे सन २०१०-११ मध्ये पात्र झाली. या गावांना बक्षिसापोटी लाखो रुपये प्रत्येक गावाला देण्यात आले. यामुळे तंटामुक्त समित्यांनी गावात समाज प्रबोधन करून ज्येष्ठ नागरिकांची गरिमा राखण्यात मोलाची मदत केली आहे. आजघडीला संयुक्त कुटुंब पध्दती कालबाह्य ठरल्याने ज्येष्ठांच्या समस्या वाढल्या आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने जेष्ठ नागरिकांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त होणारी ५५६ गावे ज्येष्ठांचा सन्मान राखण्यासाठी सरसावली आहे. भविष्यात जेष्ठांच्या समस्या वाढणार असल्याचे पाहून समिती त्या दृष्टीने पाऊल टाकत आहे. (तालुका प्रतिनिधी)