शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकांचा वाजणार बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, १२ नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला (मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडत काढणे, जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी संबंधित तहसीलदार यांच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ८ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार, १० ते १५ नोव्हेंबर या दरम्यान आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, १२ नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला (मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडत काढणे, जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी संबंधित तहसीलदार यांच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी अंतिम आरक्षण यादी जाहीर करतील. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. त्यापूर्वी निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी पदारूढ होणे आवश्यक होते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणुकीची प्रक्रिया जैसे थे ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. जि.प.मुख्यकार्यकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. 

इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात - जिल्हा परिषद निवडणुकीला घेऊन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे, तर राजकीय पक्षांनीही सभा, बैठका, मेळाव्याच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

त्या आठ ग्रामपंचायतींमुळे अडचण कायम - आमगाव नगरपंचायत की नगरपरिषद हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही, तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्यामुळे यावर भाष्य करता येणार नाही, तर आमगाव नगरपरिषदेत समाविष्ट होण्यासाठी आठ ग्रामपंचायतींनी विरोध केला आहे. या ग्रामपंचायतींनी विरोध कायम ठेवल्यास जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद, धुळेच्या  निर्णयाकडे लक्ष - स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भाने शासनाने २३ सप्टेंबर, २०२१ अध्यादेश क्रमांक ३,२०२१ काढला होता. मात्र, या अध्यादेशाच्या विराेधात औरंगाबाद आणि धुळे येथील काही नागरिकांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अद्यापही निर्णय झालेला नाही. या निर्णयानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल.

सध्या असे आहे चित्र - सध्या जिल्हा परिषदेत १४ ओबीसी, जनरल २३, एसटी १०, एससी ६ असे आरक्षण आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य शासनाने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार, ओबीसी १०, जनरल २७, एसटी १०, एससी असे आरक्षण असणार आहे. याचनुसार, आरक्षण सोडत काढली जाईल. यात ओबीसीच्या ४ जागा कमी होणार असून, जनरलच्या चार जागा वाढणार आहे. ५० टक्क्यांच्या वर आरक्षण जाऊ नये, यासाठी याच जागांसाठी ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. 

सोडतीनंतर होणार लढतीचे चित्र स्पष्ट - जिल्हा परिषद आणि पंचायत सर्कलसाठी १२ नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यानंतर, सर्कलनिहाय आरक्षणाचे चित्र स्पष्ट होईल. यानंतर, कोणत्या मतदारसंघात काटे की टक्कर होईल. कोणत्या सदस्याला सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.  

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक